पोलीस भरतीची सिद्धता करणार्‍या तरुणीवर बलात्कार करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद !

अशा वासनांध पोलिसांना बडतर्फच करायला हवे !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बुलढाणा येथे मिरवणुकीत नाचतांना युवकाची हत्या; युवतीवर अत्याचार करणार्‍यावर गुन्हा नोंद…

ऑनलाईन शिकवणीवर्गाच्या माध्यमातून ओळख झालेल्या संशयिताने येथील युवतीला शीतपयेयामधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. याचे ध्वनीचित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी दिली.

विकासाच्या नावाखाली चालू असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाची कारवाई !

मुळशी तालुक्यात विकासाच्या नावाखाली विनापरवाना चालू असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाने मोठी कारवाई केली. प्रशासकीय अनुमतीविना ८०० झाडे तोडणार्‍या विकासावर कारवाई करून वनविभागाने ८ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

कात्रज येथे आनंद मेळ्यात विजेच्या झटक्याने शाळकरी मुलाचा मृत्यू !

कात्रज परिसरात ‘फॉरेन सिटी प्रदर्शना’मध्ये वडिलांसोबत गेलेल्या गणेश पवार या ८ वर्षांच्या शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी प्रदर्शनाचे संयोजकांसह विद्युत् पाळण्याच्या मालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रे सिद्ध करणार्‍यास अटक !

जामीन मिळवण्यासाठी न्यायालयामध्ये जामीनदाराचे बनावट आधारकार्ड आणि ७/१२ चा उतारा सादर करणार्‍या योगेश सूर्यवंशी अन्य १ या २ जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शहरातील व्यावसायिक आणि रहिवासी इमारतींमध्ये अग्नीसुरक्षेविषयी उदासीनता !

जिवाला धोका आहे, हे ठाऊक असूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे नागरिक कठोर शिक्षेस पात्र आहेत !

पुणे येथे चोरीची तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ !

राज्यघटनेतील ‘सर्वांना समान न्याय’, हे तत्त्व न पाळणारे पोलीस खाते ! हा राज्यघटनेचाही अवमान नाही का ?

पिंपरी (जिल्हा पुणे) येथे नवजात बालकांची विक्री करणार्‍या ६ महिलांच्या टोळीस अटक !

आर्थिक लाभाकरता नवजात बालकांची विक्री करणार्‍या महिलांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !

शाळकरी मुलाला मारहाण करून विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद !

याविषयी १६ वर्षीय मुलाच्या आईने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. शर्मा आणि तक्रारदार महिलेच्या मुलाचा वाद झाला होता.

मुंबईवर झालेल्या २६/११च्या आतंकवादी आक्रमणाला त्याच वेळी प्रत्युत्तर द्यायला हवे होते ! – एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया खपवून न घेण्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी कणखर आणि राष्ट्रहितावह भूमिका घेणे आवश्यक !