३ वर्षांत भारत-चीन सीमेवरील ६० टक्के भागांत रस्त्यांची निर्मिती पूर्ण ! – अजय भट्ट, संरक्षण राज्यमंत्री

सीमेवर चीनच्या वाढत्या आक्रमक कारवाया पहाता भारताने गेल्या ३ वर्षांमध्ये रस्तेबांधणीसाठी गतीशील प्रयत्न केले. सीमेवर मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे.

यशस्वी जीवनासाठी सात्त्विक जीवनशैली आवश्यक ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘सी-२०’ परिषदेच्या ‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’ या कार्यकारी गटामध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाल्यावर आनंद झाला; कारण महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ‘अध्यात्म संशोधन केंद्र’ हे वरील ३ सूत्रांचे प्रत्यक्ष मूर्तीमंत उदाहरण आहे.

गोवा : पाद्री पेरेरा यांची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक टिपण्णी करून हिंदु धर्मीय आणि शिवप्रेमी यांच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी पाद्री पेरेरा यांच्या विरोधात वास्को पोलीस ठाण्यात कलम २९५ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली !

मणीपूरमध्ये नव्याने झालेल्या हिंसाचारात ३ जण ठार !

मणीपूरमध्ये सुरक्षादल आणि जमावात गेल्या २४ घंट्यांपासून चकमक चालू आहे. या चकमकीत तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये युमनम जितेन मैतेई (४६), युम्नाम पिशाक मैतेई  (६७) आणि युम्नाम प्रेमकुमार मैतेई (३९) यांचा समावेश आहे.

मुसलमानबहुल भागात सरकारी भूमीवर बांधलेल्या औषधांच्या २४ बेकायदेशीर दुकानांवर प्रशासनाचा बुलडोझर !

अशा प्रकारे विविध राज्यांमध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंसाचार केल्यावर त्यांच्या बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करण्यापेक्षा एक अध्यादेश काढूनच सर्वच बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करण्यासाठी देशातील विविध भाजप शासनांनी प्रयत्न केल्यास धर्मांधांच्या कुकृत्यांवर काही प्रमाणात तरी आळा बसेल !

नूंहमधील आक्रमणाविषयी सरकारला पूर्वसूचना नव्हती !  

हरियाणाच्या गृहमंत्र्यांचे वक्तव्य
आंतरिक शत्रूंच्या कारवायाविषयी माहिती मिळवू न शकणारी सरकारी यंत्रणा परकीय शक्तींची आक्रमणे कशी परतवून लावणार ?

नूंह येथे धर्मांध मुसलमानांनी रुग्णालयात घुसून हिंदु रुग्ण आणि डॉक्टर यांना केली होती अमानुष मारहाण !

लाठ्या-काठ्या आणि इतर शस्त्रे यांद्वारे आक्रमण, दोन गाड्या जाळल्या !
पोलिसांना ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणातून मिळाली माहिती !

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३ भारतीय सैनिकांना वीरमरण !

एकीकडे पाकचे पंतप्रधान भारताला चर्चा करण्याचे आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे आतंकवादी पाठवून भारतीय सैनिकांना ठार मारत आहेत. अशा धूर्त पाकला आता कायमचा धडा शिकवण्यासाठी भारत सरकार काही करणार कि नाही ?

तळघरात सापडली देवतेची खंडित मूर्ती !

ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा दुसरा दिवस
५ कलश आणि कमळ यांची आढळली आकृती !
२ फूटांचे त्रिशूल सापडले !

डॉ. प्रदीप कुरूलकरांनी भ्रमणभाषमधील ‘डेटा’ पुसला !

‘डी.आर्.डी.ओ.’चे येथील संचालक आणि वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरूलकर यांनी आपल्‍या भ्रमणभाषमधील ‘डेटा’ पुसला असल्‍याची माहिती अन्‍वेषणातून लक्षात आली आहे.