ख्रिस्ती धर्मप्रचारक पॉल दिनाकरन् यांच्या ठिकाणांवर घातलेल्या धाडीत १२० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त !

हिंदूंच्या संतांच्या आश्रमांवर, त्यांच्या कार्यावर टीका करतांना पैशांचा हिशोब मागणारे कधी ‘चर्च, मशिदी, मदरसे यांना पैसा कुठून मिळतो ?’, याची माहिती मागत नाहीत, हे लक्षात घ्या !

काँग्रेसवाल्यांनीच नेताजी बोस यांची हत्या घडवून आणली ! – खासदार साक्षी महाराज यांचा आरोप

केंद्रात साक्षी महाराज यांच्याच पक्षाचे सरकार आहे. त्यांनी सरकारला सांगून नेताजी बोस यांच्या मृत्यूची चौकशी करून सत्य स्थिती देशासमोर आणावी !

राजधानी देहलीच्या खान मार्केटमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

कराची, लाहोर, इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी या पाकमधील शहरांमध्ये कधी ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस कुणी करू शकेल का ? मग भारतात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस होतेच कसे ?

भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या ३ बँका सुरक्षित आहेत ! – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

आरबीआयने D-SIB (Domestic Systemically Important Banks) सूची प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे.

वर्षाला १५ लाख रुपये वेतन घेणार्‍या सनदी लेखापाल पायल शहा संन्यास घेऊन जैन साध्वी बनणार !

पैशांद्वारे शाश्‍वत आनंद घेता येत नाही, हे ज्याच्या लक्षात येते तोच अशा प्रकारचा धाडसी निर्णय घेऊ शकतो आणि पुढे ईश्‍वर त्याचे जन्मभर योगक्षेमं वहातो !

नेर (यवतमाळ) येथे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ५ जणांना अटक

तालुक्यातील बाणगाव येथे एका सायंकाळी ख्रिस्ती धर्माचा प्रसार चालू होता. ही गोष्ट भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल राठोड यांच्या लक्षात येताच त्यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी पोचून ख्रिस्ती धर्मप्रसारकांना घेराव घातला

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीच्या गोपनीय धारिकांमधील तपशील सरकारने घोषित करावा ! – भारत रक्ष मंचची ओडिशा सरकारकडे मागणी

अशी मागणी का करावी लागते ? राष्ट्राच्या एका महत्त्वाच्या घडामोडीशी निगडित ही माहिती बिजू जनता दलाने स्वतःहून उघड करणे आवश्यक आहे !

चीनकडून भारताच्या विश्वासाला तडा ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  

भारत पुनःपुन्हा त्याच्यावर विश्‍वास कसा ठेवू शकतो ? ‘चीनवर विश्‍वास ठेवणे, हा आत्मघात असून त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे’, असेच भारतियांना शासनकर्त्यांकडून अपेक्षित आहे !

मुंबईत अमली पदार्थांची विक्री करून हवालामार्गे आतंकवाद्यांना पैसा पुरवला जातो

मुंबईत अमली पदार्थांची विक्री होवून आतंकवाद्यांना पैसा जात असेल, तर पोलिसांनी हे लक्षात का आले नाही ? ही पोलिसांची निष्क्रियता नव्हे का ?

ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी श्री हनुमानाचे चित्र पोस्ट करून मानले भारताचे आभार !

विदेशातील ख्रिस्ती राष्ट्रपतींनाही श्री हनुमानाचे महत्त्व ठाऊक आहे आणि त्याविषयी आदरही वाटतो, तसेच ते भारताकडे हिंदु राष्ट्र म्हणून पहातात, हेच यातून दिसून येते. ही भारतातील बुद्धीप्रामाण्यावाद्यांना चपराकच होय !