
जयपूर – म. गांधी यांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली. एकालाच पंतप्रधान करता येणार होते. गांधी यांनी सुभाषचंद्र बोस यांना निवडणूक लढवण्यासाठी सिद्ध तर केले; पण त्यांना मारलेही, असे वक्तव्य राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील भाजपचे खासदार नरेंद्र कुमार खिचर यांनी केले. ते एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत आहे.
“गांधीजी ने कराई थी सुभाष चंद्र बोस की हत्या”
भाजपा सांसद नरेंद्र कुमार खीचड़ @kj_srivatsan pic.twitter.com/jwdHMRj9Wr
— News24 (@news24tvchannel) June 27, 2022
या वक्तव्याला विरोध होऊ लागल्यावर खिचर स्पष्टीकरण देतांना म्हणाले, ‘‘सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले पंतप्रधान व्हायला हवे होते. गांधी यांची इच्छा असती, तर बोस पंतप्रधान होऊ शकले असते. गांधी यांच्यामुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत. गांधी यांनी सुभाषचंद्र बोस यांची राजकीय हत्या केली. खरोखर मारले नाही. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे !’’
कराड येथे ‘रोडरोलर’ने जप्त केले ‘सायलेन्सर’ आणि ‘प्रेशर हॉर्न’ चिरडले !
आजपासून पावसाळ्याचे विशेष वेळापत्रक लागू !
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !
हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप
Shivayogi Lohar Suspended : लव्ह जिहादचे प्रकरण दडपणारा पोलीस निरीक्षक निलंबित !
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने पी.एफ्.आय.च्या ३ सदस्यांना जामीन नाकारला