पंचांग म्हणजे जणू समाजजीवनाचा एक अविभाज्य घटक !

‘हिंदु समाजात दैनंदिन जीवनात कोणतेही महत्त्वाचे काम करण्याआधी काळ, वेळ आणि दिवस पाहिला जातो, मग ते व्रत किंवा उत्सव असो, घरात नुकतेच जन्मलेले मूल असो, नूतन घराची वास्तूशांत करायची असो किंवा नवीन व्यवसायाचा आरंभ करायचा असो. फार पूर्वीपासून हिंदूंमध्ये ही परंपरा आहे.

हिंदु धर्मातील विवाह संस्कार आणि त्याचे महत्त्व !

‘संस्कार’ म्हणजे सुखाने उपभोग घेण्यासाठी केलेली सिद्धता ! तुळशीविवाहानंतर विवाहसोहळ्यांना प्रारंभ होतो. येथे विवाह संस्काराविषयी माहिती देत आहोत . . .

(म्हणे) ‘पुजारी अर्धनग्न, मग भाविकांच्या कपड्यांवर निर्बंध का ?’

व्यक्तीने परिधान केलेल्या कपड्यांचा तिच्या मनावर परिणाम होत असतो. तोकडे कपडे परिधान केल्यामुळे मन चंचल होते. त्यामुळे मंदिर, तसेच धार्मिक कार्यक्रम यांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार कपडे परिधान करण्याची पद्धत आहे. अध्यात्माचा गंध नसल्यामुळे धार्मिक विषयावर बोलू नये, याचे सामान्य ज्ञान नसलेल्या तृप्ती देसाई !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधना  करून सूक्ष्मातील कळायला लागले की,  यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतिशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’-  (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

(म्हणे) ‘न्यायी बळीराजाला वामनाने कपटाने मारले !’ – प्रभाकर नारकर, सामाजिक कार्यकर्ते

पौराणिक कथांमधील घटनांचा भावार्थ लक्षात न घेता केवळ बौद्धिक तर्क काढून समाजाचा बुद्धिभेद करायचा, हे बुद्धिप्रामाण्यवाद्यांचे काम आहे. त्यामुळे जनतेने शास्त्र समजून घेऊन त्यांच्या तर्कांचे खंडण केले पाहिजे अन् सणही साजरे केले पाहिजेत.

मी हिंदु, धर्माचा प्रश्‍न येईल तेव्हा धर्माच्या बाजूने बोलेन !

मी कर्माने आणि धर्मानेही हिंदु आहे. हिंदुत्व हा माझ्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. मी हिंदु धर्माविषयी बोलू शकते; मात्र आतापर्यंत बोलण्याची आवश्यकता भासली नाही; मात्र जेव्हा धर्माचा प्रश्‍न येईल, तेव्हा हिंदु धर्माच्या बाजूने बोलेन, असे वक्तव्य अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केले.

वेदांचे महत्त्व जगात पोचवणारे ब्राझिलचे जोनास मसेटी उपाख्य ‘विश्‍वनाथ’ !

विदेशी अन्य धर्मीय नागरिक भारतात येऊन वेदांचे शिक्षण घेऊन नंतर त्याच्या जगभरात प्रसार करतो, ही स्वधर्माविषयी अज्ञानी हिंदूंना चपराकच ! पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत स्वतःच्या महान धर्माकडे दुर्लक्ष करणारे हिंदु आतातरी जागे होतील का ?

वाराणसी येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत देवदिवाळी साजरी

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आल्यानंतर येथील ८४ घाटांवर १५ लाखांहून अधिक दीप प्रज्वलित करण्यात आले.

केंद्र सरकारने हिंदूंना धर्मशिक्षण द्यावे !

ब्राझिल येथील जोनास मसेटी यांनी भारतातील गुरुकुलमध्ये ४ वर्षे राहून वेदांचे शिक्षण घेतले आणि आता ते ब्राझिलमध्ये श्रीमद्भगवद्गीता अन् वेद यांचे शिक्षण देत आहेत, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये दिली.