उत्तराखंडमध्ये ईदच्या दिवशी १७ ठिकाणांची नावे सरकारने पालटली

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हरिद्वार, डेहराडून, नैनिताल आणि उधमसिंह नगर या ४ जिल्ह्यांतील १४ ठिकाणांची नावे पालटली आहेत. मुख्यमंत्री धामी यांनी ईदच्या दिवशीच या जिल्ह्यांतील अनेक ठिकाणांची नावे पालटली आहेत.
🚨 Aurangzebpur renamed as Shivajinagar & Mianwala as Ramjiwala! 🔥
On Eid, the Uttarakhand government changed the names of 17 places!
If the BJP government in Uttarakhand can do it, why not other states?
PC: @epanchjanya @knowthenation pic.twitter.com/vfuR2oQPdF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 1, 2025
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी म्हटले आहे की, ही नामांतरे सार्वजनिक भावना आणि भारतीय संस्कृती अन् वारसा यांच्या आधारे केली जात आहेत. याद्वारे लोक भारतीय संस्कृती आणि तिचे जतन यांसाठी योगदान देणार्या महापुरुषांकडून प्रेरणा घेऊ शकतात.
यासह नैनिताल जिल्ह्यातील ‘नवाबी रोड’चे ‘अटल मार्ग’ असे नामकरण करण्यात आले, तर उधम सिंह नगरमधील सुलतानपूर पट्टी नगर परिषदेचे नाव कौशल्या पुरी असे ठेवण्यात येणार आहे. हरिद्वारमधील सलेमपूरचेही ‘शूरसेन नगर’ असे नामकरण करण्यात आले.
हरिद्वार जनपद का औरंगज़ेबपुर अब शिवाजी नगर के नाम से जाना जाएगा…
जनभावनाओं के अनुरूप हरिद्वार, देहरादून, नैनीताल और उद्धम सिंह नगर जनपदों में स्थित विभिन्न स्थानों के नाम परिवर्तित किए गए हैं। pic.twitter.com/4Vp5pEocmI
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) March 31, 2025
संपादकीय भूमिकाउत्तरखंडमधील भाजप सरकारला हे शक्य आहे, तर अन्य राज्यांना ते का शक्य होत नाही ? |