‘अॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ यांनी ७ दिवसांत मराठी ‘अॅप’ चालू न केल्यास दिवाळी आमच्या पद्धतीने साजरी करू ! – मनसेची चेतावणी
महाराष्ट्रात मराठी भाषेत ‘अॅप’ चालू करावे.= मनसेची चेतावणी
महाराष्ट्रात मराठी भाषेत ‘अॅप’ चालू करावे.= मनसेची चेतावणी
मोदी शासनाने घाईगडबडीत ३ शेतकरी विरोधी विधेयके संसदेत संमत करून लोकशाहीचा गळा घोटला आहे.=पृथ्वीराज चव्हाण
सावंतवाडी नगरपरिषदेने शहरातील शिवउद्यानाजवळ श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. सावंतवाडी शहरातील मोती तलावात प्रतिवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.
जगप्रसिद्ध तंत्रज्ञ आणि ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी मागील मासात ‘डिस्कव्हरी’ वाहिनीच्या एका कार्यक्रमात भारताचे कौतुक करतांना म्हटले, ‘‘भारताकडे संपूर्ण विश्वाला कोरोनाची लस पुरवण्याची क्षमता आहे. भारतात कोरोना रुग्णांचे प्रमाण तुलनेत न्यून असूनही भारताने लसीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण काम केले आहे.
सावंतवाडी शहरात प्रतीवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. विविध मंडळांच्या माध्यमातून शहरात २० हून अधिक हड्या बांधल्या जातात; मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने १२ ऑगस्टला दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील आरोपी गोपीचंद डहाके (वय ३८ वर्षे) याच्यावर हत्येचा गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याला न्यायालयाने शिक्षा दिली होती. त्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. ६ ऑगस्ट या दिवशी पहाटेच्या सुमारास बंदीवान डहाके याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
‘इतिहासात १ ऑगस्ट या दिवसाची नोंद ‘मुस्लिम महिला अधिकार दिवस’ म्हणून झाली आहे. देशात ‘मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा’ अस्तित्वात आल्यापासून तिहेरी तलाकच्या घटनांमध्ये ८२ टक्के घट झाली असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली.
ब्राह्मणांचा द्वेष केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा परशुराम संस्कार सेवा संघाकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. राऊत यांनी राज्यघटनेची खोटी शपथ घेऊन तिचा अपमान केला असल्याचा आरोप ‘परशुराम संस्कार सेवा संघा’चे योगेश चांदोरीकर यांनी केला आहे.
सत्ताधारी राजकीय पक्ष हस्तपेक्ष करून गावाची सत्ता आपल्या कह्यात रहाण्याच्या हेतूने प्रशासक नियुक्तीचे निर्देश देत आहेत, हे लोकशाहीला मारक आहे.
३० आणि ३१ जुलै या दिवशी होणार्या सीईटी परीक्षेसाठी कर्नाटक परीक्षा विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत.