सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या समयमर्यादेव्यतिरिक्त अन्य वेळेत फटाके फोडल्यास १ सहस्र रुपये दंड

‘कृती योजने’चे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण केल्यास अधिकाधिक १ लाख रुपये दंड आकारला जाऊ शकतो

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठांत गर्दी : कोरोनाचे नियम धाब्यावर !

कोरोनाच्या संकटाची तीव्रता उणावली असली, तरी हे संकट पूर्णत: टळलेले नाही.

प्रतिदिन ३ सहस्र भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन मिळणार ! – महेश जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

‘मंदिरे उघडल्यानंतर शासनाने जे नियम घालून दिले आहेत, त्याचे भक्तांनी पालन करावे’, असे आवाहन आम्ही समितीच्या वतीने करत आहोत; कारण कोरोना महामारी अजून संपलेली नाही – हिंदु जनजागृती समिती

कोरोनाचे संकट असल्याने देवदर्शन घेतांना भाविकांनी काळजी घ्यावी ! – खासदार संजय राऊत

राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे भाविकांसाठी दिवाळीच्या पाडव्यापासून म्हणजे १६ नोव्हेंबरपासून पुन्हा खुली करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. सरकारच्या मंदिर उघडण्याच्या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी ‘प्रार्थनास्थळांवर कोरोनाविषयाची पूर्ण काळजी भाविकांनी घ्यावी’, असे आवाहन केले आहे

अवैध आणि चिनी फटाक्यांची विक्री थांबवणे, तसेच मिठाईतील भेसळ रोखणे यांसाठी मुंबई येथे धर्मप्रेमींचे पोलिसांना निवेदन

चीनचे फटाकेही बाजारात आहेत. त्यांच्यामुळे प्रदूषण होत असल्याने ते अधिक धोकादायक आहेत. अशा फटाक्यांवर बंदी घालावी, यासाठी मुंबईतील धारावी पोलीस ठाण्यात हिंदु जनजागृती समिती, वज्रदल आणि श्रीराम गणेश मंदिर मित्र मंडळ या संघटनांनी निवेदन दिले.

कोरोनाविषयीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने पुण्यातील सारसबाग अनिश्‍चित कालावधीसाठी बंद

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील उद्याने बंद करण्यात आली होती; मात्र सध्या कोरोनाचे प्रमाण न्यून होत असल्याने अनेक मासांपासून बंद असलेली उद्याने खुली करण्याविषयी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती.

कर्नाटकात मराठा समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

कर्नाटकात मराठा समाज महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका सभागृहात जागेअभावी अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास प्रशासनाचा नकार

भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिला आहे.

वीज कर्मचार्‍यांनी घेतला संप मागे !

दळणवळण बंदी काळापासून अद्यापर्यंत वीज कर्मचारी प्राणांची पर्वा न करता काम करत आहेत. शासनाने इतर विभागातील कर्मचार्‍यांना दीपावलीनिमित्त सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर केले; मात्र वीज कर्मचार्‍यांना यापासून वंचित ठेवले.

महानगरपालिका शाळांमधील गळती ?

महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या भौगोलिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे; पण तेथील शाळांची संख्या दिवसेंदिवस न्यून होत चालली आहे, हे दुर्दैवी आहे. परभणी महापालिकेमध्ये मराठी माध्यमाच्या केवळ २ शाळाच शेष आहेत.