
मुंबई – राज्यात पश्चिम महाराष्ट्रात, तसेच मराठवाड्यात भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी आणि चारा यांची प्रचंड मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी विहिरी आटल्याने हंडाभर पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर चालत जावे लागत आहे. चारा नसल्याने जनावरे विकावी लागत आहेत. फळबागा करपून गेल्या आहेत. अनेक शहरांना १५ दिवसांनी पाणी मिळत आहे. आचारसंहिता असल्याने पाण्याचे टँकर, रोजगार हमीची कामे, चारा छावण्या अद्याप चालू झालेली नाहीत. मराठवाड्यातील दुष्काळ गंभीर असून अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे हानी झाली आहे.
मराठवाड्यात ३ महिन्यांत २६७ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. बियाण्यांवर १८ टक्के जी.एस्.टी. लावला असून बियाण्यांच्या किमती ३५ ते ३८ टक्के वाढल्या आहेत. खताचे अनुदान काढल्यामुळे खतांचे भाव वाढले आहेत.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !