भारतातील युवकांची भयावह दु:स्थिती !

आजच्या बहुसंख्य युवकांसमोर विशिष्ट असे कोणतेच ध्येय किंवा आदर्श नाही. शीड नसलेले जहाज जसे वाऱ्यासमवेत सागरात कुठेही भरकटते, तसाच आजचा युवक आहे. युवकांमधील विकृती वाढत आहेत. ‘हे वेळीच रोखले नाही, तर विकासापेक्षा विनाशच होणार आहे’, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही !

इंटरनेटच्या अतीवापराने तरुणांना ‘नेटब्रेन’ या नवीन रोगाने ग्रासणे !

या व्याधीमुळे व्यक्ती समाजापासून दूर जाणे आणि मानसिक स्तरावर अस्थिर होणे अशा मानसिक अन् सामाजिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.

तरुणांनो, उठा आणि देशसेवेसाठी सिद्ध व्हा !

छोट्याशा संकटाला नका घाबरू ।।
क्रांतीकारकांचा आदर्श समोर ठेवून मार्गक्रमण करू ।।
देशसेवेचे व्रत न जाई व्यर्थ ।।
तरुणांनो, उठा जागे व्हा आणि करा जीवन सार्थ ।।

हिंदु धर्म, भारतीय संस्कृती आणि साधना यांचे महत्त्व समाजमनावर बिंबवून त्याला कार्यप्रवृत्त करणारे स्वामी विवेकानंद !

हिंदूंनी धर्म सोडला की, हिंदूंच्या जीवनाचा कणाच मोडला म्हणून समजा. ज्या पायावर या धर्माचा सुविशाल प्रासाद उभारला गेला आहे, तोच भग्न झाला, असे समजा. याचा परिणाम ठरलेलाच आहे आणि तो म्हणजे ‘सर्वांगीण विध्वंस !’

शौर्याहून श्रेष्ठ काहीही नाही !

समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘धटासी व्हावे धट, उद्धटासी उद्धट ।’ त्यांनी जी बलोपासना सांगितली, ती हिंदूंनी शौर्य गाजवण्यासाठीच ! हिंदूंच्या शौर्याची परंपरा शिकवली जात नाही; कारण हिंदूंनी शौर्य गाजवणे आणि शक्तीशाली बनणे, हे राष्ट्रद्रोही शक्तींना नको आहे.

वेळेचे सुनियोजन करून राष्ट्र आणि धर्मकार्य यांसाठीही वेळ द्या !

वेळेचा योग्य प्रकारे उपयोग करून अधिकाधिक वेळ सत्कारणी, म्हणजे देव, देश आणि धर्म यांच्यासाठी दिला पाहिजे. त्यासाठी वेळेचा अपव्यय टाळून परिश्रमपूर्वक कर्म करणे आवश्यक आहे. देवाला प्रार्थना करून नियोजन आणि कृती केल्याने कार्य वेळेत पूर्ण होण्यासाठी साहाय्य होईल !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची छायाचित्रमय क्षणचित्रे

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात गेले ७ दिवस विविध माध्यमांतून हिंदु राष्ट्र स्थापनेचा जागर करण्यात आला. राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्या संदर्भात विविध माध्यमांतून जागृती करण्यात आली.

या भारत देशाला ठिणग्यांची आवश्यकता आहे !

या पवित्र भारतभूमीत सनातन हिंदु परंपरेत देवदुर्लभ असा जन्म घेऊन जन्माचे सार्थक करण्याचे सोडून इहवादी पाश्चात्त्य प्रणालीच्या भोगजीवनाला आसुसलेली आमची उगवती पिढी रोगाची लागण झालेल्या कोंबड्यासारखी पटापट का मरत आहे ?

युवकांनो, धर्माभिमान निर्माण होण्यासाठी धर्माचरणही करा !

दैनंदिन धार्मिक कृती, उदा. पूजाअर्चा, आरती, प्रासंगिक सण आणि उत्सव शास्त्र समजून घेऊन करणे; तसेच कुलाचार, कुलपरंपरा सांभाळणे, यालाच ‘धर्माचरण’, असे म्हणतात. धर्मानुसार स्वतः आचरण केले पाहिजे आणि धर्माचरणाचा कार्यकर्ते, हिंदु समाज यांच्यातही प्रसार केला पाहिजे.

जीवनाच्या वास्तवाला सामोरे जाण्यासाठी गुणांची आवश्यकता !

काळाच्या अखंड महाओघात जी गोष्ट निर्विवादपणे तिचा अविस्मरणीय ठसा उमटवून गेली आहे, ती म्हणजे मानवी गुण !