आषाढी वारीमध्ये मूलभूत सुविधांसाठी राज्यशासनाकडून ९ कोटी रुपयांच्या निधीची मान्यता

आषाढी एकादशीनिमित्त पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतून विविध संतांच्या पालख्यांसह मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येते.

अलिबाग येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पतंजलि योग समितीकडून योग शिबिराचे आयोजन !

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या पूर्वसिद्धतेनिमित्त पतंजलि योग समिती, रायगडने १९ जून या दिवशी येथील सरखेल कान्होजीराजे आंग्रे समाधीस्थळाच्या ठिकाणी योग शिबिर आयोजित केले होते.

३० वर्षांपूर्वी भाडेकरार संपूनही अभिनेते शाहरुख खान यांचा बंगला सरकारी भूमीवर !

अभिनेते शाहरुख खान यांचा ‘मन्नत’ हा बंगला सरकारी भूमीवर असून वर्ष १९८१ मध्येच त्याचा करार संपला आहे, तो पुन्हा करण्यात आलेला नाही, असा आरोप संभाजीनगरचे कन्नड मतदारसंघातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

आर्द्रता, पंचामृत आणि भाविकांचा चरणस्पर्श यांमुळे मूर्तींची २५ वर्षांतच १.२५ मि.मी.पर्यंत झीज !

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींचीही झीज झाल्याचे आढळले !

उपचार विनामूल्य असूनही ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तील लाभार्थ्यांकडून काही रुग्णालयांनी १५ कोटी रुपये उकळले !

लाभार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा पाठवल्यानंतर त्यांच्यावर कोणती कारवाई केली, याची माहिती मिळत नाही. पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर परवाना रहित करण्यासमवेत फौजदारी कारवाई केल्यास भविष्यात असे प्रकार पुन्हा होणार नाहीत !

आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदी येथून प्रस्थान !

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान देहू येथून २० जून या दिवशी झाले. २१ जून या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे

मुंबईसह कोकणाला ५ दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ !

हवामान विभागाने २० आणि २१ जून या दिवशी मुंबईसह उपनगरासाठी अन् २० ते २३ जून या कालावधीत कोकणासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ घोषित केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शिखांचे मौन !

काबूलच्या गुरुद्वारावर नूपुर शर्मा यांच्या विधानावरून आक्रमण झाले आहे, हे हिंदूंनी विसरू नये ! याचा एकाही इस्लामी देशाने निषेध किंवा विधान केलेले नाही. इस्लामिक स्टेटचा विरोध इस्लामी देश तसेच भारतातील मुसलमानही कधी करत नाहीत. त्यांनीही गुरुद्वारावरील आक्रमणाचा विरोध केलेला नाही, हे शिखांनी लक्षात घ्यायला हवे !

वाई (जिल्हा सातारा) येथील नवीन पुलाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव द्यावे ! – शिवसेना

वाई शहरातील किसन वीर ते सोनगीरवाडी यांना जोडणाऱ्या नवीन पुलाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव द्यावे, अशी मागणी वाई शिवसेनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

सामाजिक माध्यमांवरून ‘अग्नीपथ योजने’च्या विरोधात अपसमज पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार ! – अजयकुमार बंसल, जिल्हा पोलीस अधीक्षक

भारतीय सैन्य दलामध्ये युवकांना भरती होण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘अग्नीपथ योजना’ चालू करण्यात आली आहे. या योजनेला काही राज्यांमधून विरोध दर्शवला जात आहे.