
सातारा, २० जून (वार्ता.) – वाई शहरातील किसन वीर ते सोनगीरवाडी यांना जोडणाऱ्या नवीन पुलाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव द्यावे, अशी मागणी वाई शिवसेनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विवेक भोसले, वाई शहर शाखाप्रमुख गणेश जाधव आणि कार्यकर्ते यांनी मुख्याधिकारी किरण मोरे यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. निवेदनामध्ये म्हटले आहे की, पुलाला शहराच्या लौकिकास साजेसे नाव असावे, अशी वाईतील नागरिकांची इच्छा आहे. त्यामुळे या पुलाला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्यात यावे. तसेच या पुलाच्या उद्घाटनासाठी पालिकेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाचारण करावे.
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !