
सातारा, २० जून (वार्ता.) – वाई शहरातील किसन वीर ते सोनगीरवाडी यांना जोडणाऱ्या नवीन पुलाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव द्यावे, अशी मागणी वाई शिवसेनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विवेक भोसले, वाई शहर शाखाप्रमुख गणेश जाधव आणि कार्यकर्ते यांनी मुख्याधिकारी किरण मोरे यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. निवेदनामध्ये म्हटले आहे की, पुलाला शहराच्या लौकिकास साजेसे नाव असावे, अशी वाईतील नागरिकांची इच्छा आहे. त्यामुळे या पुलाला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्यात यावे. तसेच या पुलाच्या उद्घाटनासाठी पालिकेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाचारण करावे.
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी