शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला !

आरोपी आनंद अडसूळ सध्या रुग्णालयात आहेत.

स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जगाचा भारताकडे पहाण्याचा दुष्टीकोन पालटला ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

‘स्व. मनाहेर पर्रीकर हे देशाचे संरक्षणमंत्री असतांना ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आला व ‘वन रँक, वन पेन्शन’ योजना राबवण्यात आली’ असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

नागपूर येथे कोरोना संसर्गाच्या काळात महिलांच्या संदर्भात गुन्हे वाढले !

या गुन्ह्यांविषयी कठोर शिक्षा हवी ! समाजातील गुन्हेगारी नष्ट करायची असेल, तर समाजातील लोकांना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्माचरणी करणे आवश्यक आहे, तसेच मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी शाळा आणि महाविद्यालये येथे संस्कारवर्ग आणि सत्संग घेणे आवश्यक आहे !

मराठी-अमराठी भेद गाडून हिंदुतेज आणि हिंदु धर्म वाढवावा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

१५ ऑक्टोबर या दिवशी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना साहाय्य देण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्याचा शासनाचा निर्णय !

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीतून ५० सहस्र रुपये साहाय्य निधी देण्याचा आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे.

किरीट सोमय्या यांची ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार !

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.

भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसचे लाचखोर काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती कह्यात !

असे लाचखोर लोकप्रतिनिधी असणारे पक्ष काय कामाचे ?

अनुभवी महिला नसेल, तर किमान रावणाला साहाय्य करणारी शूर्पणखा पदावर बसवू नका !

राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद मागील दीड वर्षापासून रिक्त आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

११ गुन्हे नोंद असलेले अधिवक्ता सागर सूर्यवंशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या कह्यात !

अधिवक्ताच गुन्हेगार असतील, तर समाजाने कुणाचा आदर्श घ्यायचा ? अशा अधिवक्त्यांना लवकर कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका !

जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.