शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ‘ईडी’कडून समन्स !

भावना गवळी यांनी ५५ कोटी रुपयांचा ‘बालाजी पार्टीकल बोर्ड’ हा कारखाना २५ लाख रुपयांत घेतला आहे. किरीट सोमय्या यांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे.

शेतकर्‍यांना हानीभरपाई न दिल्यास विमा अधिकार्‍यांना कारागृहात टाकू ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री

तीवृष्टीमुळे मराठवाड्यात तब्बल २० लाख हेक्टर शेतीची हानी झाली आहे. त्यापैकी ९० टक्के पंचनामेही पूर्ण झाले आहेत. विमा आस्थापनांविषयी शेतकर्‍यांकडून अनेक तक्रारी येत आहेत. या वेळी अतीवृष्टी झालेल्या भागांत हानीभरपाई न दिल्यास विमा आस्थापनांच्या अधिकार्‍यांना कारागृहात पाठवू….

न्यायालयाकडून जावेद अख्तर यांना नोटीस !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी जावेद अख्तर यांच्या विरोधात ठाणे येथील न्यायालयामध्ये खटला प्रविष्ट्र केला आहे. त्यानंतर न्यायालयाने जावेद अख्तर यांना नोटीस पाठवली आहे.

३० सहस्र रुपयांची लाच घेतांना पुणे येथील तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

मृत्यूपत्र आणि हक्कसोडपत्र यांची सातबार्‍यात नोंद करून घेण्यासाठी ३० सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या चर्‍होली येथील मारुति पवार या तलाठ्यास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २७ सप्टेंबर या दिवशी कह्यात घेतले.

राज्य मुख्य सेवा परीक्षेमध्ये प्रसाद चौगुले महाराष्ट्रात प्रथम !

राज्य सेवा (पूर्व) परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ या दिवशी मुंबईसह अन्य ३७ केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यातील ३ लाख ६० सहस्र ९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता.

होरपळणार्‍या सीमा !

आज भारताच्या सीमा घुसखोरीच्या वणव्यात होरपळत असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तेजस्वी विचारांची आठवण झाल्याविना रहात नाही. सावरकरांनी तेव्हाच म्हटले होते की, ज्या राष्ट्रांच्या सीमा सुरक्षित नाहीत, ती राष्ट्रे सुरक्षित कशी असू शकतील ?

संभाजीनगर येथे बाजार समितीने मंत्र्यांची नावे वगळल्याने भाजप पदाधिकार्‍यांचा सभेवर बहिष्कार !

येथील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची २७ सप्टेंबर या दिवशी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेच्या वार्षिक अहवालात भाजपचे २ मंत्री आणि आमदार यांची छायाचित्रांसह नावे वगळल्याने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून सभेवर बहिष्कार घातला.

जिल्ह्यातील रस्त्यांच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’ संघटनेच्या वतीने पिंगुळी येथे ‘भीक मागा’ आंदोलन !

चांगले रस्ते मिळावेत, या प्राथमिक आवश्यकतेसाठीही जनतेला ‘भीक मागा’ आंदोलन करून पैसे गोळा करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने किल्ले अजिंक्यतारा येथे स्वच्छता मोहीम !

‘छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने २६ सप्टेंबर या दिवशी १५ वी ‘गडकोट स्वच्छता मोहीम’ किल्ले अजिंक्यतारा (जिल्हा सातारा) येथे पार पडली. या मोहिमेध्ये ‘छत्रपती शासन ग्रूप महाराष्ट्र राज्य’चे संस्थापक अध्यक्ष प्राणजीत गवंडी यांच्यासह राज्याच्या कानाकोपर्‍यांतून आलेले ३५ हून अधिक मावळे सहभागी झाले होते.

कोल्हापूर-हुपरी खराब झालेल्या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करा ! – करवीर शिवसेनेचे निवेदन

कोल्हापूर ते हुपरी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून उंचगाव महामार्गापासून पुढे गडमुडशिंगी रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून रस्त्याची चाळण झालेली आहे.