
कोल्हापूर, २९ सप्टेंबर (वार्ता.) – कोल्हापूर ते हुपरी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून उंचगाव महामार्गापासून पुढे गडमुडशिंगी रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून रस्त्याची चाळण झालेली आहे. या रस्त्यावरील खडड्यांमुळे तेथे अपघात होत आहेत. तरी कोल्हापूर-हुपरी खराब झालेल्या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करा, या मागणीचे निवेदन करवीरतालुकाप्रमुख राजू यादव यांच्या पुढाकाराने कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश कांजर यांना देण्यात आले. हा रस्ता डांबरीकरण न झाल्यास करवीर शिवसेनेच्या वतीने हुपरी-कोल्हापूर ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी राजू यादव यांनी दिली आहे. (जी गोष्ट करवीर शिवसेनेच्या लक्षात येते, ती सर्व यंत्रणा असलेल्या बांधकाम खात्याच्या का लक्षात येत नाही ? रस्त्यांसारख्या मूलभूत गोष्टींसाठीही आंदोलनाची चेतावणी द्यावी लागणे, हे दुर्दैवी आहे ! – संपादक)
या वेळी अवधूत साळोखे, कामगारसेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, सागर पाटील, संतोष चौगुले, प्रफुल्ल घोरपडे, दिलीप सावंत, सचिन नागटिळक, बाळा सो नलवडे, अजित चव्हाण, बाबुराब पाटील, शिवाजी लोहार, योगेश लोहार यांसह अन्य उपस्थित होते.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !