मराठवाडा येथे अतीवृष्टीमुळे २० लाख हेक्टर शेतीची हानी !

पिकांच्या हानीमुळे शेतकर्‍यांसमोर मोठे संकट, घरांचीही पडझड ! अतीवृष्टीमुळे अनेक रस्त्यांची वाहतूक बंद ! यवतमाळ येथे पुराच्या पाण्यात एस्.टी. बस वाहून ४ प्रवाशांचा मृत्यू ! बुलढाणा येथे पैनगंगा नदीच्या पुरात दोघे वाहून गेले !

गोव्यात विशेष ‘चार्टर्ड विमाने’ येण्यासाठी केंद्रशासनाची अनुमती मिळेल ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यात विशेष ‘चार्टर्ड विमाने’ चालू करण्याची मागणी केंद्रशासनाकडे केली आहे आणि पुढील काही दिवसांत आम्हाला यासाठी अनुमती मिळेल, अशी आशा आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. कांदोळी येथे पर्यटन पोलीस साहाय्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

किल्ले पन्हाळा येथे पुरातत्व विभागाच्या कह्यात असलेल्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे पन्हाळा येथे निवेदन

किल्ले पन्हाळा या वास्तूकडे दुर्लक्ष होत असून गेल्या २ – ३ वर्षांपासून पावसाळ्यात रस्ते खचण्याचे प्रकार, अतिक्रमण आदींमुळे दुर्गप्रमी आणि शिवभक्त यांच्यामध्ये अप्रसन्नता आहे.

चारित्र्यवान लोकांचे संघटन झाले, तर देश निश्चित पालटेल ! – अण्णा हजारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

‘भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यास’ आणि ‘पारनेर तालुका माजी सैनिक मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिकांचे पहिले प्रशिक्षण शिबीर राळेगणसिद्धीमध्ये २७ सप्टेंबर या दिवशी घेण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.          

नजरकैदेत ठेवल्यास सचिन वाझे पळून जाण्याची शक्यता ! – अन्वेषण यंत्रणा

हृदयाचे शस्त्रकर्म झाल्यामुळे बरे होईपर्यंत त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्याची मागणी वाझे यांनी विशेष न्यायालयाकडे केली आहे. याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने विरोध दर्शवला असून २७ सप्टेंबर या दिवशी न्यायालयाकडे त्यांनी वरील भूमिका मांडली आहे.

गंगाखेड (परभणी) येथील ह.भ.प. ताजोद्दीन महाराज शेख यांचे देहावसान !

रात्री कीर्तन चालू होते. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी नंदुरबार येथे नेत असतांना रस्त्यातच त्यांचे निधन झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या चौकशीची माहिती घोषित करा ! – मनसेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

माहिती अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील महसूल विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासन येथील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड झाली; मात्र त्याचे पुढे काय होते, हे समजत नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने चौकशी दडपली जाते.

परिवहनमंत्री अनिल परब यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून ८ घंटे चौकशी करण्यात आली !

अनिल परब म्हणाले, ‘‘अंमलबजावणी संचालनालयाकडून विचारलेल्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे दिली आहेत. मी कुणाला व्यक्तीगत उत्तरे देण्यास बांधील नाही.’’

भाजपच्या उमेदवाराच्या माघारीमुळे हिंगोली येथील राज्यसभेची पोटनिवडणूक विनाविरोध होणार !

भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा, यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नेते अन् विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.