भारताच्या वर्ष १९७१ च्या युद्धातील विजयाच्या सुवर्ण वर्षानिमित्त फोंडा येथील क्रांती मैदानात भारतीय सेनेकडून आज कार्यक्रम

वर्ष १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील विजयाच्या ५० व्या वर्धापनदिनी स्वर्णिम विजय वर्षाच्या (सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या) विजयाची ज्योत १५ सप्टेंबर २०२१ या दिवशी फोंडा येथे पोचेल.

अकोले (नगर) येथील आदिवासी भागांतील ७६ गावांत ‘एक गाव, एक गणपति’ !

प्रशासनाने केलेल्या आवाहनाला साहाय्य करणार्‍या अकोले (नगर) येथील भक्तांचे अभिनंदन ! सणांच्या वेळी प्रशासनाला साहाय्य करण्याच्या घटना हिंदूंच्या बाबतीतच ऐकायला मिळतात, हे लक्षात ठेवा.

रत्नागिरीतील मूर्तीकार आशिष संसारे यांनी ऑलिंपिकमध्ये भालाफेक खेळात सुवर्णपदक मिळवणारे नीरज चोप्रा यांच्या रूपातील श्री गणेशमूर्ती साकारून श्री गणेशाचे केले मानवीकरण !

श्री गणेशाची कृपा होण्यासाठी श्री गणेशमूर्ती चित्र-विचित्र आकारात नव्हे, तर धर्मशास्त्रानुसार साकारली, तर त्याचा आध्यात्मिक लाभ मूर्तीकाराला, तसेच ती पूजणार्‍यालाही होतो.

नंदुरबार येथे वाहत्‍या पाण्‍यात विसर्जन करण्‍यास नगरपरिषदेने बंदी घातल्‍याने गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांत अप्रसन्‍नता !

कोरोनाच्‍या आपत्‍काळातही सामाजिक नियमांचे काटेकोर पालन करून श्री गणेशमूर्तीविसर्जन वाहत्‍या पाण्‍यात कसे करू शकतो, हे प्रशासनाने पहायला हवे होते ! चांगले नियोजन केले असते, तर ठराविक भाविकांची मर्यादा घालून मूर्तीविसर्जन वाहत्‍या पाण्‍यात करणे अशक्‍य नव्‍हते !

भाजपचे गोव्यातील निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचा २० सप्टेंबर या दिवशी गोव्यात दौरा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे गोव्यासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस २० सप्टेंबर २०२१ या दिवशी गोव्यात येणार आहेत. भाजपमधील स्थानिक निवडक कार्यकर्ते आणि नेते यांच्याशी पक्षाचे धोरण ठरवण्यात येईल.

हिंदूंच्या परिणामकारक संघटनाने लव्ह जिहादचा नायनाट होऊ शकतो ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

या कार्यक्रमाचा लाभ १ सहस्रांहून अधिक हिंदूंनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी केले, तर कार्यक्रमाचा उद्देश कु. शबरी देशमुख यांनी सांगितला.

विशाळगड विषयाच्या संदर्भात १६ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे एकत्रित बैठक !

१९ मार्च या दिवशी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांना कृती समितीने निवेदन दिल्यानंतर प्रशासनाकडून पुढील कोणतीच कृती न झाल्याने कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांची १३ सप्टेंबर या दिवशी भेट घेऊन ‘स्मरणपत्र’ सादर करण्यात आले.

विकासाच्या प्रक्रियेत पर्यावरणाचा विचार न केल्यास विनाश अटळ ! – सुरेश प्रभु, माजी केंद्रीय मंत्री

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर हवामानात सातत्याने होणारे पालट, ही धोक्याची घंटा आहे. विकास प्रक्रियेत पर्यावरणाचा विचार न झाल्यास विनाश होऊ शकतो.

न्यायालयीन पर्याय शिल्लक असेपर्यंत अनिल देशमुख ‘ईडी’समोर उपस्थित रहाणार नाहीत ! – प्रवीण कुंटे, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

प्रवीण कुंटे पुढे म्हणाले की, १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते सार्वजनिकरित्या कुठेही दिसून आले नाहीत.

मोकाट गुरे उचलून गोशाळांच्या कह्यात देण्याचा गोवा शासनाचा निर्णय

रस्त्यावर मोकाट फिरणारी गुरे ज्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात असतात अशी २० प्रमुख ठिकाणे (हॉटस्पॉट) प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली असून या जागांवरून गुरांना उचलून नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.