मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पुणे येथे गुन्हा नोंद !

चोराच्या उलट्या बोंबा ! हज हाऊसमध्ये देशद्रोही कारवाया होत असल्याचे यापूर्वी सिद्ध झालेले असतांना कोणी ही वस्तूस्थिती उघड करत असेल तर ते चूक कसे ?

छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचा ‘क्रूर वध’, असा वादग्रस्त उल्लेख करणारे लेखक आणि प्रकाशक यांच्यावर कारवाई करावी !

हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वत:चे आयुष्य समर्पित करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचा ‘वध’ म्हणून उल्लेख करणे, हा समस्त हिंदूंच्या भावनांचा हा अवमान आहे. याचे गांभीर्य ओळखून हा प्रश्‍न सभागृहात उपस्थित करणारे आमदार श्री. जयंत पाटील यांचे अभिनंदन !

मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा त्यांचे भाऊ विनोद यांचा दावा !

काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्याचे मालक मनसुख हिरेन यांचा ५ मार्च या दिवशी संशयास्पद मृत्यू झाला. हिरेन यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बनावट धर्मपरिवर्तन दाखवून खातून बी सैय्यद गफ्फार या महिलेने अनुसूचित जागेवर सरपंचपद प्राप्त केल्याचा आरोप

जातीचे बनावट प्रमाणपत्र सिद्ध करणे आणि निवडणूक आयोगाची दिशाभूल करणे या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य अन् प्रमोद भरत वाघुर्डे यांनी जालना, तसेच बुलढाणा येथील जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार प्रविष्ट करून सरपंचपद रिक्त करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्यावरील अवमानकारक पोस्टप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर कारवाई करावी ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

आरोप करणार्‍या पुण्यातील व्यक्तीला अटक

गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना केला उद्ध्वस्त !

गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडोच्या नेतृत्वाखाली ४८ घंटे अभियान करून हा कारखाना उद्ध्वस्त केला. गडचिरोली पोलिसांची ही सर्वांत मोठी कामगिरी आहे. या अभियानात एक सैनिक घायाळ झाला आहे.

आणीबाणी आणि काँग्रेस !

‘मोदी सत्तेत आल्यापासून भारतात असहिष्णुता वाढली आहे’, ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आली आहे’, अशा आवया उठवल्या जातात. राष्ट्रहितासाठी अशी कठोर पावले उचलली, तर ती असहिष्णुता कशी ? इंदिरा गांधी यांनी त्यांचे विरोधक वरचढ होऊ नयेत, यासाठी आणीबाणी लागू केली. यात राष्ट्रहित नव्हे, तर त्यांचा स्वार्थ होता.

फाशीची चिंता नाही ?

चोर-दरोडेखोरांना ठाऊक असते की, ‘फार काय करतील, २-४ वर्षे आत रहावे लागेल इतकेच !’ आणि आता तर बलात्कारी अन् खुनी यांनाही कळून चुकले आहे की, ‘फाशी वगैरे काही लगेच होत नसते !’ ज्याचा धाक असायला हवा, त्यातीलच हवा निघून गेली आहे ! सगळ्यांना मोकळे रान मिळाले आहे, असेच तर यातून दिसून येत नाही ना ?

सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नावाचा वापर करून समाजाची दिशाभूल करणार्‍या भोंदूंपासून सावध रहा !

सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नावाचा किंवा शिकवणीचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचे लक्षात आल्यास आम्हाला त्वरित कळवा.