जगात भारतच पाकचे एकमेव शत्रूराष्ट्र असल्याचा इम्रान खान यांचे वक्तव्य !
पाकशी चर्चा करण्याची भारताला कोणतीही इच्छा नाही आणि भारत चर्चा करणारही नाही. भारताने पाकवर थेट सैनिकी कारवाई करून पाक नावाचे शत्रूराष्ट्र संपवावे, असेच भारतियांना वाटते !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा स्वायत्त दर्जा परत मिळत नाही, तोपर्यंत भारताशी चर्चा शक्य नाही, असा पुनरुच्चार पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका मुलाखतीत केला.‘भारत सोडल्यास अन्य कोणताही देश आमचे शत्रूराष्ट्र नाही. पाकिस्तानात अस्थिरता माजवण्याचे प्रयत्न भारताकडून केले जात आहेत’, असा फुकाचा आरोपही इम्रान खान यांनी या वेळी केला. (याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! – संपादक)
“No talks possible with India until they restore the autonomous status” of #JammuAndKashmir, #Pakistan PM #ImranKhan said.https://t.co/ayNHfunqIx
— India.com (@indiacom) January 10, 2021
इम्रान खान यांनी आरोप करतांना पुढे म्हटले की, भारताने शांतता प्रस्थापित करण्याविषयी एक पाऊल पुढे टाकायचे सोडून काश्मीरचा भूभाग हडपला आहे. भारताकडून काश्मिरी नागरिकांवर सातत्याने अन्याय केला जात आहे.
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत