दळणवळण बंदी असतांना बोटीने प्रवास केल्याचे प्रकरण
मूळचे रत्नागिरीतील असलेल्या ३४ खलाशांवर प्रशासनाकडून गुन्हे नोंद
मूळचे रत्नागिरीतील असलेल्या ३४ खलाशांवर प्रशासनाकडून गुन्हे नोंद
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे आस्थापन असलेल्या ‘कॉग्निझंट’ने कर्मचार्यांसाठी सध्याच्या दळणवळण बंदीच्या काळात अतिरिक्त वेतन देण्याची घोषणा केली आहे.
‘ब्रह्मकुमारी संस्थे’च्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांचे २७ मार्च या दिवशी दुपारी २ वाजता माउंट अबू येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या १०४ वर्षांच्या होत्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘दळणवळण बंदी’चे प्रकरण
आपत्काळात किती संयमाने वागणे आवश्यक आहे, हे या घटनेवरून लक्षात येईल !
कोरोनाविरुद्धच्या लढाईत खारीचा वाटा म्हणून शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक मासाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे.
ईश्वरपूर येथील सौदी अरेबियात हज यात्रेसाठी जाऊन आलेल्या ५ नागरिकांना ही लागण झाल्याचे चार दिवसांपूर्वी स्पष्ट झाले आहे. त्यातील कोरोनाची लक्षणे दिसणार्यांचे नमुने पडताळणीसाठी पाठवण्यात आले होते. यामुळे आता ईश्वरपूर ‘हाय अलर्ट’वर आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य, फळे, भाजीपाला यांच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष) स्थापन करण्यात आली आहे. या ‘वॉर रूम’साठी १८००२ ६७८४६६ हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.
एका अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्यानंतर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. अशा वासनांधांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सैन्य पूर्ण सामर्थ्य देईल, असे प्रतिपादन सैन्यदल प्रमुख मनोज नरवणे यांनी केले.
जागतिक महासत्ता असलेली अमेरिका कोरोनाच्या संसर्गाचे नवे केंद्र बनल्याचे समोर येत आहे. जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत सापडले आहेत. तेथे एकूण ८५ सहस्र ७४९ जणांना कोरोनाची लागण झाली असून अमेरिकेने रुग्णांच्या आकडेवारीत चीन (८१ सहस्र ३४०) आणि इटली (८० सहस्र ५८९) यांना मागे…