मधमाशांचे पोळे बनवण्याच्या खोक्यांचे शेतकर्‍यांना वितरण

गोवा खादी आणि ग्रामीण उद्योग महामंडळाने उत्तर गोवा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थेच्या सहयोगाने एका विशेष सोहळ्याद्वारे जुने गोवे येथील कृषी क्षेत्रात सांताक्रूझचे आमदार आंतोनियो फर्नांडिस यांच्या हस्ते मधमाशांचे पोळे बनवण्याच्या १०० खोक्यांचे वितरण केले.

‘बालभारती’ची स्वत:ची शैक्षणिक वाहिनी चालू होईल ! – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

यात बालचित्रवाणीतील चांगले शैक्षणिक साहित्य पुनरुज्जीवित करून त्याचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न रहाणार आहे,

पुण्यातील नाटक, लोककला आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम यांना अनुमती

सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे कार्यचालन कार्यपद्धतीचा अवलंब करून नाटक, लोककला अंतर्गत तमाशा, लावणी आणि इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना अनुमती देण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

सावंतवाडी कुटीर रुग्णालयात कोरोनाची लस देतांना कोरोना योद्धा असलेल्या पालिका कर्मचार्‍यांना प्राधान्य दिले नाही ! – माजी आरोग्य सभापती परिमल नाईक

हा प्रकार योग्य नाही. कोरोना काळात पालिका सफाई कर्मचारी, आरोग्यसेवक, यांनी ज्या पद्धतीने कामे केली, त्यामुळे आपण शहरात मोठया प्रमाणात कोरोनावर मात करू शकलो.

ओमकार ग्रूपच्या अध्यक्षांना अटक

ओमकार बिल्डरच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकून अध्यक्ष कमल गुप्ता आणि संचालक बाबूलाल वर्मा यांना अटक केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील कातरणी ग्रामपंचायतीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रहित

कातरणी ग्रामपंचायतीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रहित करण्यात आली आहे.

सरसंघचालक मोहनजी भागवत ३१ जानेवारीला तपोभूमीला भेट देणार

सरसंघचालक मोहनजी भागवत सध्या गोवा दौर्‍यावर आहेत. सरसंघचालक मोहनजी भागवत ३१ जानेवारी या दिवशी कुंडई येथील श्रीक्षेत्र तपोभूमीला भेट देणार आहेत.

लोणंद (जिल्हा सातारा) येथे अज्ञात वाहनाने ३ जणांना चिरडले !

लोणंद-खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळ २८ जानेवारीला सकाळी ६ वाजता एकाच कुटुंबातील सदस्य फिरायला निघाले होते. एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने २ जण जागीच ठार झाले, तर १ जण गंभीर घायाळ झाला आहे.

१ फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल रेल्वेसेवा चालू होणार ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

शासनाच्या नियमानुसार मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने आणि आस्थापने रात्री ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येतील.

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबईत ५ नवीन सायबर पोलीस ठाणी

सायबर गुन्ह्यांच्या अन्वेषणासाठी, तांत्रिक साहाय्यासाठी पोलिसांना तसेच तक्रारदारांना गुन्हे शाखेच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील सायबर पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागत होते.