आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (१४.४.२०२५)

विकृत मानसिकतेच्या लोकांमुळेच समाज रसातळाला चालला आहे !

आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्याकडून शिक्षक स्थानांतर प्रक्रियेत ३९ कोटी रुपयांचा घोटाळा ! – बाळासाहेब सानप, ओबीसी नेते

भाजपच्या आमदार सौ. पंकजा मुंडे मंत्री असतांना हा घोटाळा झाला आहे. या भरती प्रक्रियेत त्यांचा कुठलाही संबंध नव्हता, असेही त्यांनी सांगितले. 

कलम ३७० हटवणे आणि ‘सीएए’ हे हिंदु राष्ट्र निर्मितीच्या दिशेने ठाम पाऊल ! – आमदार गोपीचंद पडळकर, भाजप

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौर्‍यावर आले असतांना गोपीचंद पडळकर यांनी त्यांची भेट घेऊन पुण्यश्लोक अहित्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे त्यांना निमंत्रण दिले.

पुणे येथील कुख्यात गुंड टिपू पठाणची पोलिसांनी काढली धिंड !

गुंडांना वचक बसण्यासाठी त्यांची समाजात अशा प्रकारे छी-थू करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे आवश्यक आहे !

सिंहगडावर विदेशी पर्यटकासमवेत गैरवर्तन करणार्‍या ४ तरुणांवर गुन्हा नोंद !

विदेशींसमवेत गैरवर्तन करून भारताची मानहानी करणारी तरुण पिढी देशाला रसातळालाच नेईल ! हे वेळीच रोखायला हवे !

हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करू नये ! – अधिवक्ता आलोक कुमार, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, विश्व हिंदु परिषद

मंदिरांना हिंदु धर्मियांच्या स्वाधीन करून त्यांच्या श्रद्धेला मुक्त वाव द्यावा आणि मंदिरांचे सरकारीकरण थांबवावे, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता आलोक कुमार यांनी केली.

अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात धर्मसंकीर्तन महोत्सव !

२६ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस आहे. त्या दिवशी पहाटे २ ते ४ प्रभातफेरी, पहाटे ४ ते ५ नामस्मरण, पहाटे ५ वा. काकड आरती, यानंतर श्रींचे दर्शन, ११ वाजता महानैवेद्य आरती, दुपारी १२ वाजता अक्कलकोट राजघराण्याचा महानैवेद्य श्रींना अर्पण होईल.

उमेरड एम्.आय.डी.सी. स्फोटातील मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ६० लाख रुपये !

सर्व मृतक आणि घायाळ कामगार उमरेड अन् भिवापूर तालुक्यांतील आहेत. शासन कामगार कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

भारतीय इतिहास आणि संस्कृती यांचे दर्शन घडवणारा ज्ञानकुल संस्थेचा ‘ज्ञानोत्सव’ पार पडला !

अन्य शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, पालक, इतिहासप्रेमी, संशोधनप्रेमी, तसेच शेकडो नागरिक यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.

नागपूर येथे महिला साहाय्यक प्राध्यापकाची निर्घृण हत्या !

पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली असली, तरी डोक्यावरील जखमा लक्षात घेता त्यांचा खून करण्यात आला असण्याची शक्यता अधिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.