पोलिसांवर आक्रमण आणि पोलिसांच्या वाहनावर दगडफेक  

लोकशाहीचा पाया असलेली ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्यात निवडणूक आयोग अपयशी झाला, असे समजायचे का ?

पैसे घेऊन विलगीकरणातून सूट देणार्‍या कर्मचार्‍यांना अटक

स्वार्थासाठी जनतेच्या जीवावर उठलेल्या शासकीय कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई केली तरच इतरांना जरब बसेल !

सरस्वतीदेवीचा अपमान केल्याप्रकरणी यशवंत मनोहर यांची महाराष्ट्र करणी सेनेकडून पोलिसात तक्रार

सरस्वतीदेवीची प्रतिमा ठेवण्यास विरोध केल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची, तसेच बौद्ध आणि हिंदु धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार करून कवि यशवंत मनोहर यांना अटक करण्याची मागणी पोलीस ठाण्यात केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात ११ केंद्रांवर कोविड लसीकरणास प्रारंभ 

कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठीच्या कोविड लसीकरणास १६ जानेवारी या दिवशी जिल्ह्यात ११ केंद्रांवर नियोजनबद्ध पद्धतीने प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३० सहस्र १८४ आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांना लस दिली जाणार आहे.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ 

कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा १६ जानेवारीला प्रारंभ करण्यात आला. सांगली जिल्ह्यात ९ लसीकरण केंद्रांवर लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.

भिवंडीमध्ये ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी जादूटोण्याचा वापर, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

एकीकडे राज्यात जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार अंधश्रद्धा निर्मूलनासाठी राज्यशासन प्रयत्नशील असतांनाच दुसरीकडे निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना हरवण्यासाठी किंवा इजा पोचवण्यासाठी चक्क जादूटोणा होणे, हे कायद्याचा उपयोग होत नसल्याचे निदर्शक आहे का ?

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या भूमीवरील शैक्षणिक आरक्षण कायम रहाण्यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करू ! – सुधीरदादा गाडगीळ, आमदार, भाजप

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या विश्रामबाग येथील सर्व्हे क्रमांक ३६३/२ या ६ सहस्र ६०० चौरस मीटर भूमीची भाजपचे आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी पहाणी केली.

मालवणी (मुंबई) येथील शेकडो हिंदु परिवारांचे धर्मांधांच्या दहशतीमुळे पलायन !

हिंदूबहुल देशात हिंदूंची अशी स्थिती होणे, हे शासकीय यंत्रणांना लज्जास्पद होय ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती अपरिहार्य आहे, हे यातून लक्षात येईल !

राज्यातील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या शाळा २७ जानेवारीपासून चालू होणार ! – वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग यापूर्वीच चालू झाले असून येत्या २७ जानेवारीपासून इयत्ता ५ वी ते ८ वीपर्यंतच्या शाळा चालू होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १५ जानेवारी या दिवशी दिली.

८९ जणांना जामीन संमत; ठाणे न्यायालयाचा निर्णय

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे १६ एप्रिल या दिवशी जमावाने केलेल्या आक्रमणात २ साधू आणि त्यांचा वाहनचालक अशा तिघांची हत्या झाली होती. या प्रकरणी १६ जानेवारीला ठाणे न्यायालयाने ८९ जणांना जामीन संमत केला आहे.