८९ जणांना जामीन संमत; ठाणे न्यायालयाचा निर्णय

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे १६ एप्रिल या दिवशी जमावाने केलेल्या आक्रमणात २ साधू आणि त्यांचा वाहनचालक अशा तिघांची हत्या झाली होती. या प्रकरणी १६ जानेवारीला ठाणे न्यायालयाने ८९ जणांना जामीन संमत केला आहे.

पेरीड (जिल्हा कोल्हापूर) गावात ग्रामपंचायतीसाठी शून्य टक्के मतदान !

शाहूवाडी तालुक्यातील पेरीड ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गेली ६८ वर्षे गावात निवडणूक झालेली नाही. यंदा ९ पैकी ८ जागा बिनविरोध झाल्या. एका जागेसाठी निवडणूक झाली. यामुळे बिनविरोध परंपरा मोडीत निघणार म्हणून गावातील एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नाही.

पुण्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहीम चालू

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते १६ जानेवारी या दिवशी येथील कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहीम चालू झाली. पुणे जिल्ह्यात सायंकाळपर्यंत ३१ केंद्रांवर ३ सहस्र १०० जणांना लस देण्यात आली.

प्रभु श्रीराम म्हणजे राष्ट्रदेव ! – भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल

प्रभु श्रीराम हे हिमालयाप्रमाणे धैर्यवान, तर सागराप्रमाणे गंभीर आहेत. राष्ट्राला एकसंध बांधण्याचे काम प्रभु श्रीरामांनी केले आहे. ते केवळ श्रीराम नाहीत, तर आपल्या सर्वांसाठी राष्ट्र आहेत, तसेच ते आपले राष्ट्रदेव आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी १५ जानेवारी या दिवशी येथे केले.

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासन आणि महाविद्यालये यांना निवेदने !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ मोहीम 

सर्व आरोग्य कर्मचार्‍यांनी कोरोनाची लस घेऊन मोहिमेस सहकार्य करावे ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचार्‍यांनी कोरोना योद्धा म्हणून चांगले काम केले आहे. कोणतीही भीती न बाळगता सर्व आरोग्य कर्मचार्‍यांनी कोरोनाची लस घ्यावी आणि या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

महादेवाचे केरवडे गावातील भ्रमणभाषच्या मनोर्‍याचे काम पूर्ण होण्यासाठी ग्रामस्थांची उपोषणाची चेतावणी

तालुक्यातील महादेवाचे केरवडे पंचक्रोशी गावासाठी वर्ष २०१७ – २०१८ मध्ये भारत दूरसंचार निगमचा (बीएस्एन्एल्) मनोरा (टॉवर) संमत झाला आहे. असे असूनही ३ वर्षांमध्ये केवळ त्याच्या पायाचेच बांधकाम पूर्ण झाले आहे.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी सत्तेचा गैरवापर ! – राजन तेली

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटिसीमध्ये पूर्वीचे मतदार ठराव कायम रहातील, अशी सूचना केली आहे. याला आमचा आक्षेप आहे. ते ठराव ज्या वेळी घेतले, त्या वेळची आणि आताची स्थिती वेगळी आहे.

नागपूर खंडपिठाची पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस

‘आनंद साजरा करा; पण नायलॉन मांजा वापरू नका’, असे आवाहन सेंटरने केले आहे.

अनेक वर्षांपासून कुळाचार म्हणून प्रत्येक कार्यक्रमात श्री सरस्वती देवीची प्रतिमा वापरून स्तवन करतो ! – मनोहर म्हैसाळकर, अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ

‘श्री सरस्वती देवीची प्रतिमा ही कुठल्या धर्माचे प्रतीक नाही, तर ती विद्येची देवता आहे.