बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची संपत्ती ५ वर्षांत १ लाखाहून थेट ४१ लाखांवर पोचली !

असा ‘चमत्कार’ भारतात राजकारण्यांच्या संदर्भात नेहमीच होत असतो आणि जनतेलाही ते अपेक्षित असते ! जर असे झाले नाही, तर ते आश्‍चर्यच ठरते ! असे ‘चमत्कार’ रोखण्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था हवी !

नेटफ्लिक्सवर ३० मिनिटे व्हिडिओ बघण्याने ६ किलोमीटर वाहन चालवण्याएवढे प्रदूषण निर्माण होते !

युनायटेड किंग्डममधील प्रतिष्ठित रॉयल सोसायटीच्या वैज्ञानिकांच्या अहवालानुसार ‘नेटफ्लिक्स’वर १ घंटा मालिका पाहिल्यास त्याचा परिणाम थेट ग्रहांवर होतो. एखादे चारचाकी वाहन साधारणतः ६ किलोमीटर चालवल्यावर त्यातून जेवढ्या प्रमाणात प्रदूषण होते

देशातील ४२ सहस्र शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची, तर १५ सहस्र शाळांमध्ये शौचालयांची सोय नाही ! – केंद सरकारची माहिती

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही अशी स्थिती असणे हे आतापर्यंतच्या  शासनकर्त्यांना लज्जास्पद ! सरकारने ही स्थिती सुधारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत !

जगभरातील सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांपैकी २२ शहरे भारतात !

देशातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हे रोखण्यासाठी आतापर्यंत काहीच न केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. देशातील सर्व प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !

जगभरातील ३ पैकी १ मुलगी शारीरिक किंवा लैंगिक अत्याचाराला बळी पडते ! – जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल

महिलांचा योग्य सन्मान भारतासह जगात राखला जात नाही. तिला केवळ उपभोग घेणारी वस्तू म्हणून पाहिले जात असल्याने अशा घटना घडत आहेत.

गोव्यात युवती घर सोडून ‘ऑनलाईन’ प्रियकरासमवेत जाण्याचे वाढते प्रकार !

एकत्र कुटुंबपद्धत नसल्याचा, मुलांना सुसंस्कारित करण्याकडे लक्ष न देता मुलांचे लाड करतांना त्यांना ‘स्मार्ट फोन’ दिल्याचा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्यानंतर समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचा हा परिणाम आहे !

दळणवळण बंदीमध्ये देशातील १० सहस्र ११३ आस्थापने बंद ! – केंद्र  सरकारची माहिती

एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये देशातील १० सहस्र ११३ आस्थापने बंद झाली आहेत. त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता स्वेच्छेने त्या बंद झाल्या आहेत, अशी माहिती कंपनी व्यवहार मंत्रालयाने दिली आहे.

वर्ष २०१८ च्या तुलनेत वर्ष २०१९ मध्ये दंगली, हत्या, बलात्कार आदींच्या घटनांत अल्प प्रमाणात घट ! – केंद्र सरकारचा दावा

देशातील गुन्हेगारीत अल्प प्रमाणात घट होण्याऐवजी ते पूर्णपणे रोखणे हेच लक्ष्य असले पाहिजे, तरच समाज सुरक्षित आणि शांततेत जगू शकेल !

देशात महिलांच्या विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ ! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

भारतीय स्त्री ही शालीन, सोज्वळ आणि पवित्र समजली जात होती; मात्र या सर्वेक्षणातून भारतीय महिलांचे झपाट्याने होत असलेले अधःपतन आपल्या लक्षात येते. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे.

(म्हणे) ‘मोदी सरकार आल्यापासून भारतात लोकांना मिळणारे स्वतंत्र्य घटले !’ – अमेरिकेतील ‘ग्लोबल फ्रीडम हाऊस’चा अहवाल

अमेरिकेत वर्णद्वेषी आक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असतांना या अमेरिकी संस्थेने प्रथम तेथील लोकांच्या स्वातंत्र्याची काळजी घ्यावी. भारतात कुणाला किती स्वातंत्र्या द्यायचे, याची काळजी घ्यायला भारतीय समर्थ आहेत !