
नवी देहली – कोरोनामुळे अनेक आस्थापनांनी ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना चालू केली. आज एक वर्षानंतरही ही स्थिती कायम आहे. कोरोनाच्या संक्रमणातही पुन्हा वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘वर्क फ्रॉम होम’ ही पद्धत कायमसाठीच चालू ठेवण्याविषयी ८७ टक्के भारतीय उद्योग गांभीर्याने विचार करत आहेत’, असे बीसीजी (बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप) आणि झूम या आस्थापनांनी केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. या सर्वेक्षण केलेल्या उद्योगांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे काम करणार्या कर्मचार्यांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली, असा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. हा अहवाल भारत, अमेरिका, ब्रिटन, जपान, फ्रान्स आणि जर्मनी या ६ देशांतील महत्त्वाच्या उद्योग व्यवसायांविषयीच्या निरीक्षणांवर आधारित आहे.
‘वर्क फ्रॉम होम’ची प्रभावीपणे आणि सुरळीतपणे कार्यवाही झाल्यामुळे या देशांतील उद्योग-व्यवसाय पैशांची बचत करू शकले. महामारीमुळे झालेल्या दळणवळण बंदीमुळे कित्येक जण बेरोजगार झाले, ह सत्य असले, तरी वर्क फ्रॉम होम आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यांचा पर्याय अनेकांच्या नोकर्या वाचवूही शकल्या. एकट्या अमेरिकेत या पद्धतीमुळे २ लाख २८ सहस्र नोकर्या वाचल्या.
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)