कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून ‘गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र’ या मागणीसाठीचा धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्चा स्थगित !

गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र यांसह अन्य मागण्यांसाठी २५ फेब्रुवारी या दिवशी धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्च्याचे आयोजन कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून स्थगित करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात घडणार्‍या ठळक घडामोडी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने १० सहस्र भाविकांना प्रवेश ‘पास’ देण्यात येत आहेत. यापूर्वी ३० सहस्र भाविकांना दर्शन घेता येत होते.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा सातारा जिल्हा पत्रकार संघाकडून निषेध !

लोकसभा आणि विधानसभा यांच्या प्रचारासाठी सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची शेवटची प्रचार सभा झाली होती. ही सभा केवळ राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याने एका छायाचित्रकाच्या साहाय्याने टिपली होती. या वेळी कोणीही पत्रकार उपस्थित नव्हते, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

पृथ्वीवरील कार्बन अल्प करण्यासाठी बांबूची लागवड करा ! – पाशा पटेल, माजी अध्यक्ष, पर्यावरण अभ्यासक तथा कृषीमूल्य आयोग

‘पृथ्वीवर आता मानवजात जिवंत रहाणार नाही’; कारण पृथ्वीवरचे तापमान आणि कार्बन हे दोन्ही वाढत आहे. वर्ष २०२४ मध्ये पृथ्वीचे तापमान वाढणार आहे आणि ज्या दिवशी ते अडीच अंशाने वाढेल, त्या दिवशी पृथ्वीवर माणूस जगणार नाही, अशी भीतीही या कराराच्या वेळी व्यक्त करण्यात आली होती.

…तर परत टाळेबंदीला सामोरे जावे लागेल ! – पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची संभाजीनगरकरांना चेतावणी

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले, तर रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागेल आणि वेळप्रसंगी दिवसाही संचारबंदी करावी लागेल’, अशी चेतावणी येथील पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

इतर प्रभागांत गेलेली नावे परत समाविष्ट न केल्यास आंदोलन करू ! – रविकिरण इंगवले, शिवसेना

शिवसेनेचा महापौर होऊ नये, म्हणून त्यांच्या हक्काचे ६०० ते १ सहस्र मतदार दुसर्‍या मतदारसंघात टाकायचे आणि या ठिकाणी विरोधकांचे मतदार घुसवायचे, असे षड्यंत्र चालू आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे पालखी मार्ग होणार भक्तीमार्ग ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे काम पुढील दीड वर्षांत पूर्ण केले जाईल. यासाठी १२ सहस्र कोटी रुपयांची तरतूद !

हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याला पुणे येथेच चोपायला हवे होते ! – राज ठाकरे यांचा संताप

सध्या राज्यात अशाच पद्धतीचे राजकारण चालू आहे. कुणाला तरी बोलायला लावायचे आणि त्यावर मग राजकारण करायचे, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. 

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर करण्यास सज्ज ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

आता कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे पक्षश्रेष्ठींचे स्वप्न साकार करण्यास कोल्हापूरची शिवसेना सज्ज झाली आहे.

(म्हणे) ‘अण्णा हजारे हे अविश्‍वासू !’- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर

अण्णा हजारे यांनी काय करावे आणि ते कसे आहेत, हे देशाची सर्वाधिक हानी करून देशाला रसातळाला नेणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. अण्णा हजारे यांनी काय करावे आणि काय करू नये, याचे स्वातंत्र्य त्यांना नाही का ?