असुरक्षित मुंबई !
काही दिवसांपूर्वी मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवलेली गाडी आढळली होती. त्याविषयी मुंबई, महाराष्ट्रातील सुरक्षायंत्रणांसह राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा अन्वेषण करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवलेली गाडी आढळली होती. त्याविषयी मुंबई, महाराष्ट्रातील सुरक्षायंत्रणांसह राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा अन्वेषण करीत आहेत.
मुंबई शहरात वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे पोलीस खात्यातील कार्यालयात गट-अ आणि गट-ब संवर्गातील अधिकार्यांची उपस्थिती १०० टक्के ठेवण्यात येणार आहे; मात्र गट-क आणि ड संवर्गातील कर्मचार्यांंची कार्यालयातील उपस्थिती ५० टक्के राहील,असे आदेश देण्यात आलेले आहेत.
आरोग्य, शिक्षण क्षेत्रात समाजमाध्यमांद्वारे विविध उपक्रम राबवून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणार्या मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूत कार्यालयामधील प्रतिनिधींचा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
अनिल देशमुख यांनी सांगितले की, डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अनेकांची नावे आत्महत्या पत्रामध्ये लिहिली आहेत. भाजपचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर केंद्राचा दबाव होता का ? या सर्व त्रासामुळे डेलकर यांनी आत्महत्या केली का ? याची पडताळणी केली जाईल, दोषींवर कडक कारवाई केली जाईल.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ‘मास्क लावला नाही, तर दळणवळणबंदी करावी लागेल’, असे सांगितले. हाच सल्ला त्यांनी जरा भेंडीबाजार आणि बेहरामपाडा येथेही द्यावा, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे.
मुंबईसाठी पुढील ८ ते १५ दिवस फार महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.
कन्यादान करणार्या व्यक्तीच्या मागील १२ पिढ्या, पुढच्या १२ पिढी आणि स्वतःची १ पिढी यांचा उद्धार होतो, असे धर्मशास्त्र सांगते. मात्र फुकाचा पुरोगामीपणा मिरवण्यासाठी अशी टूम सध्या निघाली आहे. हिंदूंनी यापासून सावध रहावे !
गांजाची शेती करून नक्षलवाद्यांची राष्ट्रविरोधी मोहीम : विविध माध्यमांतून राष्ट्रविरोधी कारवाया करणारे नक्षलवादी आणि त्यांना सहकार्य करणारे राष्ट्रद्रोही यांचा कसून शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी !
जे सामान्यांना ठाऊक असते, ते पोलीस आणि शासन यांना ठाऊक नसते असे नव्हे. अवैध धंदे चालणार्या सर्वच ठिकाणांवर धाडी टाकून ते धंदे पूर्णतः संपवण्याची इच्छाशक्ती कोणते सरकार आणि त्यांचे पोलीस राबवणार ?, हा प्रश्न आहे !
मराठी शाळांना इंग्रजी नाव दिल्याने आधुनिक झाल्यासारखे वाटते का ? इंग्रजी नाव देऊन शिक्षणाचा दर्जा सुधारणार, असे वाटते का ? हे सर्व अतिशय हास्यास्पद आणि मराठीचा उद्घोष करणार्यांसाठी लाजिरवाणे आहे !