हिंदूंनो, आतंकवाद्यांचा प्रतिकार करण्याची सिद्धता करा !

लक्षात ठेवा, शस्त्रपूजनाद्वारे उपकरणांमध्ये शक्तीची प्रतिष्ठापना होते. अपराजितादेवीचे पूजन म्हणजे पराजय टाळणे आणि विजयप्राप्ती यांसाठी केलेली शक्तीची आराधना होय. सीमोल्लंघन म्हणजे प्रत्यक्ष विजयासाठी शत्रूच्या सीमेत प्रवेश करणे होय. विजयादशमीच्या कर्मकांडांचा हा अर्थ जाणून काळानुसार प्रत्येक कृती करा !

विजयाप्रीत्यर्थ आराधना !

आज विजयादशमी ! हिंदु धर्मामध्ये ‘अधर्मावर धर्माचा विजय होणे’, म्हणजेच ‘वाईटावर चांगल्याचा विजय होणे’, ही विजयाची परिभाषा आहे. हा मापदंड लावल्यावर ‘भारताला विजयपथावर नेण्यासाठी कोणती आव्हाने आहेत ?’ याचा अभ्यास आणि ती आव्हाने पार करण्याचा शुभसंकल्प आजच्या दिनी व्हायला हवा.

हिंदूंनो, प्रत्येक दिवस हा विजयदिनच व्हायला हवा !

सध्याची राष्ट्राची स्थिती पहाता याच सीमोल्लंघनाची आज आवश्यकता आहे. हिंदु धर्मावर आघात करणार्‍यांच्या विरोधात संघटितपणे उभे रहाणे आणि ते आघात दूर करणे, हे खरे सीमोल्लंघन !

विजयादशमीविषयी संत आणि सद्गुरु यांचे अमूल्य विचार !

‘देवीने नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून दैवी विचार आणि बलशक्ती घेऊन दुष्ट शक्तींना नामशेष करण्यासाठीच सीमोल्लंघन केले होते. हे कार्य कायमस्वरूपी आहे.’

दसर्‍याच्या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने देण्याचे महत्त्व !

‘दसर्‍याच्या दिवशी समस्त हिंदू एकमेकांना आपट्याची पाने देऊन स्नेहसंबंध दृढ करतात.

मंगलमय दसरा !

‘दसरा’ या शब्दाची फोड ‘दस + हरा’. दसर्‍याला उत्तर हिंदुस्थानात ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘हरणे’ म्हणजे घेऊन जाणे. दशहरा म्हणजे ‘माझे दहा अवगुण घेऊन जा.’

विजयाची गौरवशाली परंपरा जोपासणारी प्राचीन भारतीय शस्त्रास्त्रविद्या !

विजयादशमीच्या निमित्ताने राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे अन् उपकरणे स्वच्छ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात. शेतकरी आणि कारागीर हेही आपापली आऊते अन् हत्यारे यांची पूजा करतात.

विजयादशमीला (दसर्‍याला) श्री सरस्वतीचे पूजन करणे

‘दसर्‍याला सरस्वतीतत्त्वाच्या क्रियात्मक पूजनाने जिवाच्या व्यक्त भावाचे अव्यक्त भावात रूपांतर होऊन त्याचा स्थिरतेत प्रवेश होण्यास साहाय्य होते.

विजयादशमीनिमित्त शौर्यजागरणाचा संकल्प करूया !

महिषासुरमर्दिनी ही क्षात्रतेजाचे प्रगट रूप आहे, हे लक्षात घेऊन नवरात्रोत्सव आणि विजयादशमी यांच्या निमित्ताने स्वतःमधील क्षात्रतेज जागृत करणे म्हणजेच शौर्यजागरण करणे होय ! तीच आजच्या काळाची आवश्यकता आहे.