पुन्हा इंद्रप्रस्थ !

‘देहली’ शब्दामुळे देशात अशांतता आहे. तिचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ केल्यास भारतात शांतता नांदू शकेल’, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी केला आहे.

राजधानी देहलीचे नाव पालटून ‘इंद्रप्रस्थ’ करा ! – भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची मागणी

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्यावर येऊ नये. सरकारने स्वतःहून असे पालट करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचा आकडा अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट ! – जागतिक आरोग्य संघटना

वर्ष २०२० मध्ये जगभरात कोरोनामुळे कमीत कमी ३० लाख लोकांचा मृत्यू झाला. हा आकडा मृतांच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट आहे. कोरोनामुळे जीव गमावणार्‍यांची अधिकृत आकडेवारी अत्यंत अल्प दाखवली जात आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.

एक ऐवजी १० आस्थापनांना लस बनवण्याचे परवाने द्या ! 

पुरवठ्यापेक्षा अधिक लस देण्याची मागणी होत असेल, तर अडचण येणारच आहे. लस उत्पादनासाठी सरकारने एका आस्थापनाऐवजी १० आस्थापनांना  मान्यता द्यावी. त्यांना देशात पुरवठा करू द्यावा आणि मग जेव्हा आपल्याकडे अतिरिक्त लसी येतील, तेव्हा ही आस्थापने परदेशात लसी निर्यात करतील.

भारतात तिसरी लाट येणे अटळ ! – केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन्

भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पहाता ते होणार आहे. केवळ ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणे कठीण आहे. आपण या तिसर्‍या लाटेसाठी सिद्ध रहायला हवे…..

२ मास विनामूल्य शिधा, तर रिक्शा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचे साहाय्य !

दळणवळण बंदीमुळे देहली सरकारचा निर्णय !

एकच गोळी घेऊन कोरोना दूर करणार्‍या गोळीची फायझर आस्थापनाकडून चाचणी

औषध निर्मिती करणार्‍या फायझर आस्थापनाने कोरोना प्रतिबंधात्मक लस बनवल्यानंतर आता कोरोना झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यासाठी गोळी बनवली असून त्याची चाचणी सध्या चालू आहे.

आता पाणी डोक्यावरून गेले आहे, आजच्या आज ऑक्सिजन पुरवा !

न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारतांना म्हटले की, आम्ही केंद्र सरकारला निर्देश देतो की, त्यांनी काहीही करून देहलीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवावा. त्यासाठीचे टँकर पुरवण्याचे दायित्वही केंद्राचेच आहे.

देशात तात्काळ दळणवळण बंदी लावा !

सध्या आपण जशी अंशत: बंदी आणत आहोत, तशी नाही, तर देशव्यापी दळणवळण बंदी हवी; कारण कोरोनाचा संसर्ग संपूर्ण देशात वाढत आहे, असा सल्ला ‘कोविड टास्क फोर्स’च्या सदस्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

कोरोनाच्या काळात भारतीय सैन्याचे साहाय्य घेऊ शकतो का ? – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न

भारतीय सैन्य, अर्धसैनिक दल, तसेच भारतीय रेल्वेचे डॉक्टर केंद्राच्या अखत्यारीत येतात. अशा वेळी ‘क्वारंटाईन’, लसीकरण किंवा इतर ठिकाणी त्यांचे साहाय्य घेऊ शकतो का ? यावर राष्ट्रीय योजना काय आहे ?, असे प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले. ‘