पत्रकार राणा अयुब यांचे ट्विटर खात्यावर बंदी

काशी येथील ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात केलेल्या ट्वीटमुळे ट्विटरने पत्रकार राणा अयुब यांच्या ट्विटर खात्यावर बंदी घातली आहे. भारत सरकारने राणा अयुब यांच्या खात्यावर कारवाई करण्याची मागणी ट्विटरकडे केली होती.

देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ११ सहस्र ५७८ नवे रुग्ण

देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ११ सहस्र ५७८ नवे रुग्ण आढळले आहेत, तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ५ दिवसांत ७० सहस्र २६५ नवीन रुग्ण आढळले आहेत.

वर्ष २००२ मधील गुजरात दंगल हे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील षड्यंत्र ! – गृहमंत्री अमित शहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्यासाठीच संपूर्ण षड्यंत्र रचण्यात आले होते; परंतु शेवटी सत्य समोर आले. दंगलींचा राजकीय उपयोग करणे अयोग्य आहे.

नौदलाचे आजी-माजी सैनिक आता मर्चंट नेव्हीमध्ये काम करू शकतात !

असा करार भारतीय नौदल आणि नौवहन संचालनालय यांच्यात झाला आहे.

भारतीय फूटबॉल महासंघाने खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी घेतले ज्योतिष आस्थापनाचे साहाय्य !

प्रारब्ध, देवाण-घेवाण आदी सूक्ष्मातील गोष्टींचा मानवी जीवनावर होत असलेला परिणाम बुद्धीने जाणून घेण्याचे उत्कृष्ट माध्यम म्हणजे ज्योतिषशास्त्र ! हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अशा घटनांना विरोध केला जातो !

पैगंबरावरील विधानामुळे भारताच्या प्रतिमेला हानी पोचली ! – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

पाकिस्तान, बांगलादेश, तसेच आखातातील इस्लामी देश अल्पसंख्यांकांचा छळ करतात, तसेच हिंदूंचा वंशसंहार करतात, तरी ते त्यांच्या प्रतिमेचा कधी विचार करत नाहीत आणि भारतही त्यांना यावरून जाब विचारत नाही, याविषयी कोण बोलणार ?

‘अग्नीपथ’च्या विरोधात ‘भारत बंद’चे आवाहन : ५०० हून अधिक रेल्वे गाड्या रहित

सर्वोच्च न्यायालयाने बंदचे आवाहन करणार्‍यांकडून दंड वसूल करण्याचा आदेश दिलेला असतांनाही असे आंदोलन करणार्‍या संघटनांवर बंदीच घातली पाहिजे !

चीनने भारताशी केलेल्या करारांचे उल्लंघन केले ! – विदेशमंत्री

विदेशमंत्री एस्. जयशंकर यांनी चीनला सुनावत म्हटले की, भारत कोणत्याही परिस्थितीत वास्तविक नियंत्रणरेषेच्या सद्य:स्थितीमध्ये पालट करू देणार नाही.

काही देश वहात्या गंगेमध्ये हात धुऊन घेण्याचा प्रयत्न करत आहेत ! – विदेशमंत्री

नूपुर शर्मा यांनी महंमद पैंगबर यांच्यासंदर्भात केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीवर अनेक इस्लामी देशांनी भारतावर टीका केली होती. यावर विदेशमंत्री एस्. जयशंकर यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘‘ती टिप्पणी भारत सरकार अथवा भाजप या दोघांची भूमिका नव्हती.

केंद्रीय सशस्त्र दल आणि आसाम रायफल्स यांमध्ये अग्नीवीरांसाठी १० टक्के आरक्षण

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स यांमध्ये भरतीसाठी अग्नीपथ योजनातील सैनिक ‘अग्नीवीर’ यांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला. या दलांमधील भरतीसाठी वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट देण्यात आली होती.