विशाळगडावर मद्याच्या बाटल्यांचा ढिग आणि मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा
इतका कचरा गोळा होईपर्यंत पुरातत्व विभाग आणि प्रशासन काय करत होते ? पुरातत्व विभाग पांढरा हत्ती बनला असून तो गडकोटांकडे दुर्लक्ष करत असल्याने शेवटी हे कार्य गडकोटप्रेमी आणि शिवभक्तांना करावे लागत आहे, हे पुरातत्व खात्यासाठी लज्जास्पद !