पुणे येथे मतदान केंद्र परिसरात काँग्रेसचे फलक असल्यामुळे भाजपचे आंदोलन !

फडके हौद परिसरात भाजपच्या पदाधिकार्‍यांनी मतदान केंद्राच्या परिसरात काँग्रेसचे फलक असल्याने आक्षेप घेत रस्त्यावर आंदोलन केले.

साजणीतील अवैध फटाका कारखान्यावर धाड

पोलिसांनी अधिक पडताळणी केली असता त्यांना या कारखान्याच्या जवळच असलेल्या अन्य एका साठाकेंद्रात मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनियिम पावडर, अर्धा पोते गंधक, वजनकाटा, लोखंडी चाळणी आणि फटाके आढळून आले.

‘मतदार सूचीतील नाव वगळले गेल्यास संबंधितांना मतदान करता येणार’ हा संदेश चुकीचा !

हा संदेश प्रसारित करणार्‍या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू केल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली आहे. मतदानाच्या संदर्भात चुकीचा संदेश किंवा अफवा पसरवल्यास कठोर कारवाई करण्याची चेतावणीही प्रशासनाने दिली आहे.

भाजपने पैसे वाटल्याने गुन्हा नोंद करावा ! – काँग्रेस पक्षाचे उमेदवार धंगेकर यांची मागणी

लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपने पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका सावनी रवींद्र यांचे नावच मतदारसूचीत नाही !

मतदार सूचीतील नावांचा सर्वत्र असणारा प्रचंड गोंधळ ‘डिजिटलायझेशन’च्या गोष्टी करणार्‍या भारतासाठी लज्जास्पद !

लोकसभेच्या ४ थ्या टप्प्याचे महाराष्ट्रात ५२.४९ टक्के मतदान !

लोकसभेच्या ४ थ्या टप्प्याचे १३ मे या दिवशी महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांत मतदान झाले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान झाले.

Intellectual Discrimination Of Hindus : (म्हणे) ‘ख्रिस्ती झाल्याने मी मृत्यूवर मात करू शकले !’ – तमिळी अभिनेत्री मोहिनी श्रीनिवासन्

असे आहे, तर आज सर्वाधिक आत्महत्या ख्रिस्ती देश असलेल्या लिथुएनिया, हंगेरी, इस्टोनिया आणि अमेरिका या ठिकाणी का होतात ? अशा प्रकारची वक्तव्ये करून हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचाच हा कावेबाज प्रकार आहे, हे लक्षात घ्या !

नागपूर खंडपिठाने जात पडताळणी समितीच्या सदस्यांना ठोठावला ५० सहस्र रुपयांचा दंड !

सर्व काग दपत्रे असतांनाही जातवैधता प्रमाणपत्र नाकारले ! दंडाची रक्कम समितीच्या सदस्यांना ४ आठवड्यांत जमा करायची आहे.

राष्ट्रविकास आणि विश्वशांती यांसाठी महात्मा बसवेश्वरांचे विचार प्रेरणादायी ! – प्रवचनकार मिलिंद चवंडके

व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणार्‍या मानवी सामाजिक मूल्यांचा दीपस्तंभ म्हणजे महात्मा बसवेश्वर होत. त्यांचे वचन साहित्य जीवनतारक संदेश देणारे आणि आजच्या काळातही मार्गदर्शन करणारे आहे.

विहित कर्मातून परमेश्वरी कृपा होते, हा शंकराचार्यांचा उपदेश अंगीकारणे आवश्यक ! – वेदमूर्ती सचिन भाटवडेकर

वेदांचा नित्य अभ्यास करा, त्यातून ज्ञान आणि विज्ञानाची उत्पत्ती होते. विहित कर्म करा, त्यातून परमेश्वरी कृपा होते, असा उपदेश शंकराचार्यांनी केला आहे.