भ्रष्टाचार प्रकरणी ‘महावितरण’च्या अभियंत्याचे निलंबन !

भ्रष्टाचार्‍यांना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत भ्रष्टाचार रोखता येणार नाही, हे प्रशासनाने लक्षात घेऊन कठोर कारवाई करणे आवश्यक !

महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाची पंचगंगा नदीच्या घाटावर अग्नीशमन, शोध आणि बचाव यांची प्रात्यक्षिके !

संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून २७ मे या दिवशी पावसाळ्यापूर्वी अग्नीशमन विभागाकडून अग्नीशमन, शोध आणि बचाव कार्य यांची प्रात्याक्षिके पंचगंगा नदीघाट येथे सादर करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड येथे जितेंद्र आव्हाड यांच्या छायाचित्रास ‘जोडे मारा’ आंदोलन !

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवारगट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेला फलक फाडला. त्या विरोधात भाजपच्या ‘अनुसूचित जाती मोर्चा’च्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या छायाचित्राला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.

राज्यातील विनावापर औद्योगिक भूखंडांची माहिती ऑनलाईन प्रसिद्ध होणार !

विनावापर पडून असलेल्या म्हणजेच वापरात नसलेल्या राज्यातील औद्योगिक भूखंडांची माहिती ऑनलाईन प्रसिद्ध करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याविषयी अभ्यास करण्यासाठी शासनाने ३० मे या दिवशी एका समितीची स्थापना केली आहे.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्यामुळेच काशीचे पुनर्निर्माण झाले ! – सुधीरदादा गाडगीळ, आमदार, भाजप

देशातील कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या काशीचे माहात्म्य पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी पुन्हा प्रस्थापित केले. राजमाता अहिल्यादेवींचे हे उपकार हिंदु समाज कधीच विसरणार नाही’, असे विचार भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी येथे व्यक्त केले.

वाढीव आकाराची होर्डिंग न काढल्यास होर्डिंग अनधिकृत ठरवून पाडण्याची पिंपरी-चिंचवड पालिकेची चेतावणी !

पिंपरी-चिंचवड शहरातील २४ अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यात आली आहेत. महापालिकेने परवाना दिल्यापेक्षा अधिक आकाराचे, तसेच अधिक उंचीवर लावण्यात आलेल्या एकूण ३६५ होर्डिंगधारकांना आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने नोटीस बजावल्या आहेत.

महाराष्ट्रात व्यसनमुक्ती मोहिमेचे तीन-तेरा, पुरस्काराच्या निधीतून कार्यक्रम राबवण्याची वेळ !

व्यसनमुक्तीसाठी काम करणार्‍या राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या कर्मचार्‍यांना मागील १५ महिने मानधनाची रक्कमही देण्यात आलेली नाही. अशा प्रकारे राज्यात व्यसनमुक्ती मोहिमेचे तीन-तेरा वाजले आहेत.

राहुल गांधी यांनी १९ ऑगस्टपूर्वी प्रथमवर्ग सत्र न्यायालयामध्ये उपस्थित रहावे !

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतियांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संदर्भ देऊन काही आक्षेपार्ह विधान केले होते.

वाहतूककोंडीच्या त्रासामुळे हिंजवडी आयटी पार्कमधील (पुणे) ३७ आस्थापने स्थलांतरित !

स्थानिक प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे !

पुणे अपघातानंतर पब, हुक्का पार्लर यांवर पोलिसांच्या धाडी, गल्लीबोळातून दुचाकीवर रात्री गस्त !

कोणताही अनुचित प्रकार घडल्यावर खडबडून जागे होण्याऐवजी, असे प्रकार घडूच नयेत यासाठी उपाययोजना करण्यात खरे शहाणपण नव्हे का ?