विद्यालयांतील लैंगिक शोषणाच्या विरोधातील समित्यांना प्रशिक्षण देणार ! – शिक्षण संचालक झिंगडे

वाढते विनयभंग पाहून आता प्रशिक्षण देणार्‍या शिक्षण खात्याने आतापर्यंत हे का केले नाही ? केवळ कागदोपत्री समित्या स्थापन करून खाते गप्प बसले का ?

अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे ! – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ आणि अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक याप्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल.

अंबरनाथ येथे इमारतीचा सज्जा कोसळून १ महिला ठार, तर १ जण घायाळ

अंबरनाथ पश्चिम भागातील फातिमा शाळेच्या शेजारी असलेल्या अण्णा सोसायटीतील तिसर्‍या मजल्यावरील एका खोलीचा सज्जा २ सप्टेंबरला पहाटे ५ वाजताच्या सुमारास कोसळला.

मुंबईत विदेशी मद्याचा १ कोटी रुपयांचा साठा जप्त !

गोवा राज्यातील मद्य छुप्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेल्या तिघांच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा नोंदवला.

‘चंद्रयान ३’ आणि ‘आदित्य एल् १’ मोहिमांमुळे भारत बलशाली ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश असणार्‍या आपल्या भारताची या दोन्ही मोहिमांतून ‘वैज्ञानिकदृष्ट्या बलाढ्य देश’ अशी ओळख निर्माण झाली आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

‘एन्.एम्.एम्.टी.’च्या कायम कर्मचार्‍यांसह कंत्राटी कर्मचार्‍यांना वैद्यकीय विमा योजना !

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची स्थापना वर्ष १९९६ मध्ये झाली; मात्र उपक्रमाला २३ वर्षे होऊनही येथे कार्यरत असलेल्या कायम तसेच ठोक मानधनावरील कर्मचार्‍यांना वैद्यकीय विमा योजना लागू करण्यात आली नव्हती.

सांगली महापालिका क्षेत्रात लवकरच १०० ‘इ-बस’ चालू होणार !

लवकरच सांगली महापालिका क्षेत्रात ‘इ-बस’ चालू होणार आहे. ही सेवा चालू करण्यासाठी शासन महानगरपालिकेला १०० ‘इ-बस’ देणार आहे, अशी माहिती सांगली महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी दिली.

‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’च्या निमित्ताने तासगाव तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करावी !

शाळा-महाविद्यालयांत श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचे आवाहन करणारे श्री. सचिन चव्हाण यांचे अभिनंदन !

साधनेच्या अभावी बुद्धीप्रामाण्यवादी आंधळेच !

‘डोळे उघडले की, दिसते, तसे साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत झाली की, सूक्ष्मातील दिसते आणि कळते. साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत होईपर्यंत बुद्धीप्रामाण्यवादी आंधळेच असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

स्वैराचार आणि बलात्कार !

देशातील महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार यांच्या घटना थांबण्याचे नाव नाही. सरकार कुणाचेही असो महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ऑगस्टमध्ये गोवा राज्यात बलात्काराच्या ६ घटना घडल्या. विनयभंगाच्या १२ तक्रारी झाल्या.