(म्हणे) ‘महाविद्यालयातील हिंदु विद्यार्थिनींचे अश्‍लील व्हिडिओ बनवल्याची घटना फारच लहान !’ – गृहमंत्री डॉ. जी परमेश्‍वर

कर्नाटकमध्ये काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंंना हे विधान मान्य आहे का ? आरोपी मुसलमान आणि पीडित हिंदु विद्यार्थिनी असल्यानेच काँग्रेसचे मंत्री असे विधान करत आहेत. याउलट स्थिती असती, तर एव्हाना दोषींवर कठोर कारवाई झाली असती !

महाराष्ट्रात वाघांची संख्या १९० वरून ५०० झाली ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

वाघांची संख्या वाढत चालल्याने ‘वाघ घेता का वाघ ?’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. पिंजर्‍यातही वाघ आणि बिबटे यांची संख्याही प्रचंड वाढली आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनंटीवार यांनी विधान परिषदेत केले.

केंद्रीय मंत्र्यांना अश्‍लील ‘व्हिडिओ कॉल’ करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारे २ धर्मांध अटकेत !

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना अश्‍लील ‘व्हिडिओ कॉल’ करून त्याद्वारे त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारे महंमद वकील आणि महंमद साहिब या दोघांना देहली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.

प्रभु श्रीराम आणि महाराणा प्रताप यांचा अवमान : महंमद शाकिब अहमद याला अटक !

असा अवमान जर अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांचा करण्यात आला असता, तर  पोलिसांनी स्वत:हून त्वरित कारवाई केली असती ! बहुसंख्य हिंदू असा धाक पोलीस आणि सरकारी व्यवस्था यांच्यात कधी निर्माण करणार ?

भारतासमवेतचे भक्कम संबंध श्रीलंकेच्या विकासासाठी महत्त्वाचे ! – श्रीलंका

भारतासमवेत भक्कम नाते निर्माण करतांना चीनला दूर ठेवणे आणि श्रीलंकेतील तमिळ हिंदूंचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. श्रीलंकेने त्याविषयी भारताला आश्‍वस्त करून कृती करावी !

लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार !

ही प्रकरणे वर्ष २००७ पासूनची आहेत. यांतील ४० पैकी ३३ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. आणखी ५ जणांवर लवकरच आरोपपत्र प्रविष्ट करण्यात येईल. अनधिकृत तुकड्यांना मान्यता देणे, चुकीचे शालार्थ ‘आयडी’ देणे आदी प्रकार या प्रकरणात झाले आहेत.

श्रीलंकेने तमिळांच्या प्रश्‍नांवर बोलावली सर्वपक्षीय बैठक !

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी देशातील अल्पसंख्य तमिळांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. त्यांनी सर्व पक्षांना या संदर्भातील चर्चेत सहभागी होऊन यावर एकमत निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.

‘कोचिंग क्लास’ घेणार्‍या अनेकांनी शाळांच्या मान्यता घेतल्या आहेत ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

लोकप्रतिनिधींनी राज्यात ‘कोचिंग क्लास’चे पेव फुटले आहे. शाळा चालू असतांना कोचिंग क्लास घेण्यात येतात. त्यामुळे शाळा ओस पडत असल्याचे सभागृहात सांगितले.

सर्पदंशावरील संपूर्ण उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करावेत !

रुग्णाला ‘व्हेंटिलेटर’वर ठेवल्याचे सिद्ध झाले, तरच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून साहाय्य मिळते, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर अध्यक्षांनी असे निर्देश दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ गावे पूरग्रस्त : २३२ नागरिकांचे स्थलांतर

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात २७ जुलैपर्यंत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.