रत्नागिरी जिल्ह्यात मुसलमान लोकसंख्येत वाढ, तर हिंदु लोकसंख्येत लक्षणीय घट !

‘हम पाच-हमारे पच्चीस’ हे धोरण, धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांमुळे मुसलमानांची संख्या वाढली नाही, तरच नवल !

पुणे येथील कोयता गँगचा बीमोड करण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम !

शहरातील ४३ गुंडांना तडीपार करण्यात आले असून १२ टोळ्यांमधील ७५ गुन्हेगारांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली.

भारत-पाकिस्तान देशांच्या सीमेवर ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार !

शत्रूशी लढणार्‍या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये तसेच त्यांच्या शौर्याचे प्रतिदिन स्मरण करून शत्रूंबरोबर लढण्याचे बळ मिळावे यासाठी ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भारत आणि पाकिस्तान देशांच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे.

कराड येथे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ट्रक हस्तगत !

नूडल्सच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा ट्रक पकडून विदेशी दारूच्या बाटल्या, आयशर ट्रक, भ्रमणभाष असा ५२ लाख ७३ सहस्र ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कराड येथील श्री मारुतीबुवा मठाच्या तत्कालीन मठाधिपतीस ७ वर्षे सक्तमजुरी !

जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मठाचे तत्कालीन मठाधिपती बाजीराव जगताप यांना न्यायालयाने दोषी धरून ७ वर्षे सक्तमजुरी आणि ७ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सरकारी योजनांतील निधीच्या दुरुपयोगाविषयी ‘कॅग’ने नोंदवलेल्या आक्षेपांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

‘कॅग’ने नोंदवलेले ४०० हून अधिक आक्षेप प्रलंबित असल्याची माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’ला प्राप्त झाली आहे.

पाकीटबंद पदार्थांमध्ये वापरले जाणारे घटक ‘वनस्पतीजन्य’ कि ‘प्राणीजन्य’ आहेत, हे ओळखण्याची यंत्रणाच नाही !

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अर्जानंतर माहिती अधिकारातून अन्न आणि औषध प्रशासनाचा फोलपणा उघड !

द्रमुकचे नगरसेवक आणि त्यांचे साथीदार यांच्या मारहाणीत सैनिकाचा मृत्यू

सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाच्या या कृत्यावरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय आहे, हे लक्षात येते ! असे लोकप्रतिनिधी असणार्‍या द्रमुकवर बंदीच घातली पाहिजे !

बांदा (उत्तरप्रदेश) येथे मशिदीचे अवैध नूतनीकरण बजरंग दल आणि विहिंप यांच्या कार्यकर्त्यांनी रोखले !

अशी घटना प्रशासनाला लज्जास्पद ! जे काम प्रशासनाने करायला हवे, ते करण्यासाठी हिंदु संघटनांना कायदा हातात घेऊन पुढाकार का घ्यावा लागतो ? उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंना हे अपेक्षित नाही !