महिलांनी कपाळाला कुंकू लावणे ही हिंदु धर्माची शिकवण ! – अजय सिंह सेंगर, करणी सेनाप्रमुख, महाराष्ट्र

अनेक हिंदुत्वनिष्ठांनी ‘हिंदु महिलांनी कपाळाला कुंकू लावायला हवे’, अशी भावना सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे व्यक्त केली.

मुंबई येथील हाजीअली दर्गा येथे आतंकवादी आक्रमणाची धमकी !

महालक्ष्मी येथील हाजीअली दर्गा येथे आतंकवादी आक्रमणाची धमकी देण्यात आली आहे. याविषयी धमकीचा दूरभाष ३ नोव्हेंबर या दिवशी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला उल्हासनगर येथून आला होता.

रामदासी संप्रदायाच्या मठाच्या मालकीची ४०० एकर भूमी परस्पर विकण्याचा प्रकार !

विक्री थांबवण्याची मंदिर संस्थानचे विश्वस्त रामचंद्र गोसावी यांची मागणी

रूपी बँकेचा परवाना रहित करण्याच्या आदेशाच्या स्थगितीची मागणी अर्थ मंत्रालयाने फेटाळली !

नियमांचे उल्लंघन करणे आणि आर्थिक अनियमिततेमुळे तोट्यात आलेल्या रूपी सहकारी बँकेला वाचवण्याचे न्यायालयीन आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयातील सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्याने ही बँक इतिहासजमा होणार आहे.

इयत्ता १० आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ !

अंतिम वार्षिक परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी २५ नोव्हेंबर, तर इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

घोडेगाव (पुणे) येथे उत्कृष्ट उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा !

आंबेगाव, पुणे येथील युवा उद्योजक, ‘जे.के. ग्रुप’चे संस्थापक, तसेच व्यापार आघाडीचे अध्यक्ष श्री. जयेशभाऊ काळे पाटील यांच्या २७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट उद्योजकाचा सन्मान सोहळा नुकताच घोडेगाव येथील ‘अमित गेस्ट हाऊस’मधील मंगल कार्यालयात साजरा झाला.

वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड तालुका करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या राज्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतर लवकरच राजगड तालुका होणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मावळा जवान संघटना आणि तालुक्यातील शिष्टमंडळाला दिली.

पुणे येथे इतिहासप्रेमी मंडळाने कांचनबारीच्या (जिल्हा नाशिक) लढाईचा इतिहास जिवंत केला

वर्ष १६७० मध्ये सूरत लुटून परत येत असतांना छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांशी युद्ध करावे लागले. शत्रूच्या प्रदेशात असूनही युद्धनीतीचा चातुर्याने वापर करत मराठ्यांनी विजय मिळवला. ही विलक्षण शौर्यकथा इतिहासप्रेमी मंडळाने ४० X २५ फूट भव्य प्रतिकृतीतून ‘साउंड अँड लाईट शो’द्वारे उलगडली आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला अवैध इमारतींची माहिती द्या !

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत किती अनधिकृत आणि अवैध इमारती आहेत. यांपैकी किती बांधकामधारकांनी महानगरपालिकेची अनुमती न घेता, बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन अवैध इमारती उभारल्या आहेत

इस्रायलमध्ये बेंजामिन नेतान्याहूच !

‘मेक इन इंडिया’तही इस्रायलची तंत्रज्ञानातील गुंतवणूक चांगल्या प्रकारे असून नेतान्याहू परत एकदा पंतप्रधान झाल्याने भारतात उत्पादित होणार्‍या सर्वच स्वदेशी उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रात गती मिळेल. भारताने आतंकवादाच्या विरोधात आणखी खुलेपणाने इस्रायलचे साहाय्य घेऊन ‘आतंकवादमुक्त भारत’ करावा, हीच अपेक्षा !