भारतीय परंपरेत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अग्निहोत्र विधीला ‘पेटंट’ !

भारतीय परंपरेमध्ये महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अग्निहोत्र या विधीवर आधारित प्रयोगाला ‘पेटंट’ मिळाले आहे. प्रत्येकाने येणार्‍या आपत्काळासाठी अत्यंत उपयुक्त असा अग्निहोत्र विधी शिकणे आवश्यक !

बुलढाणा येथे सैलानी बाबांच्या यात्रेत गर्दी केल्याच्या प्रकरणी १ सहस्रांहून अधिक जणांवर गुन्हे नोंद !

कोरोनाच्या आपत्काळात दायित्वशून्यपणे वागणारे असे नागरिक भीषण आपत्काळात काय करतील, याची कल्पनाच न केलेली बरी !

पुन्हा नक्षलवादी आक्रमण !

नक्षलवाद्यांना चीनसारख्या देशांतून शस्त्रसाठा मिळत आहे, तोही रोखण्याचा प्रयत्न गेल्या ६० वर्षांत होऊ शकलेला नाही, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे मोठे अपयश आहे.

१८ ते ३५ वयोगटातील तरुणांना तातडीने लसीकरण करण्याची व्यवस्था करावी !

‘जीव धोक्यात घालून फिरणार्‍या पत्रकारांनाही लस द्यावी’, अशी विनंती आव्हाड यांनी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करणार असल्याचे सांगितले.

पुणे येथे ३ वर्षांत ४ सहस्र ५०० महिलांच्या हरवण्याची नोंद !

संसारातील कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी संयम आणि तडजोड करण्याची वृत्ती असणे आवश्यक आहे. असे का वागायचे असते, याचे शास्त्र समजले की, कृती करणे सोपे जाते. यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.

भारतातील सर्व मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त करा ! – गुरुप्रसाद गौडा, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

बेळगाव येथील १६ मंदिरे सरकारने कह्यात घेण्याचे ठरवले. तेव्हा मंदिर विश्‍वस्त, पुजारी आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याला विरोध केला. याचा परिणाम म्हणून २ दिवसांत हा आदेश सरकारने तात्पुरता स्थगित केला.

अन्वेषणातून इतके विषय बाहेर येतील की, राजकारणावरील जनतेचा विश्‍वास उडेल ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

मंत्रीमंडळातील एक मंत्री १५ वर्षे एका महिलेशी संबंध ठेवल्याचे उघडपणे सांगतो, ठेवतो, दुसरा मंत्री २२ वर्षांच्या युवतीसमवेत संबंध ठेवतो, गृहमंत्री १०० कोटी रुपयांची वसुली मागतात हे विषय आतापर्यंत बाहेर पडले आहेत.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निर्णयाच्या संदर्भात आज महत्त्वाची बैठक !

इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निर्णयाच्या संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ६ एप्रिल या दिवशी महत्त्वाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल. या बैठकीला शिक्षण मंडळाचे अधिकारी उपस्थित असण्याची शक्यता आहे.

पाकमध्ये आतंकवाद्यांकडून न्यायमूर्तींसह तिघांची हत्या

पाकच्या आतंकवादविरोधी न्यायालयाचे न्यायमूर्ती आफताब आफ्रिदी हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत पेशावर-इस्लामाबाद या मार्गावरून जात असतांना आतंकवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

कोरोना केंद्रासाठी शिवाजी विद्यापिठाची इमारत कह्यात घेणार ! – सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर

कोल्हापुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हा प्रशासनाने शासकीय इमारती कोरोना उपचारांसाठी कह्यात घेतल्या होत्या. आता दुसरी लाट आल्याने पुन्हा शासकीय इमारती कह्यात घेण्यासाठी हालचाली चालू आहेत