आळेफाटा (पुणे) येथे वर कोबीची पोती लावून गोमांस वाहतूक, २ टन गोमांस जप्त

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही करणार का ?

श्री जोतिबा खेटे आयोजित करू नका ! – जिल्हाधिकार्‍यांचे देवस्थान व्यवस्थापन समितीला पत्र

मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत विधीस अनुमती

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे ५ परिवार देवता मंदिरांच्या जिर्णोद्धार कामाचे भूमीपूजन

५ परिवार देवतांच्या मंदिरांचा जिर्णोद्धार आणि श्री विठ्ठल मंदिरातील सभा मंडपाचे सुशोभिकरण या कामांचे भूमीपूजन २५ फेब्रुवारी या दिवशी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

गोवंशाची हत्या केल्याप्रकरणी ३ जणांवर गुन्हा नोंद

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता या घटनेतून दिसून येते !

सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील २५.५४ किलोमीटर रस्ता केवळ १८ घंट्यांत पूर्ण

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नुकतेच सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरण करतांना २५.५४ किलोमीटर (एक पदरी) रस्ता केवळ १८ घंट्यांत पूर्ण केला आहे. ठेकेदार आस्थापनाच्या ५०० कर्मचार्‍यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत.

सातारा पोलिसांची जुगाराच्या अड्ड्यावर धाड; ५० जणांना अटक

येथील शाहूपुरी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये चालू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये १० लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला असून ५० जणांना अटक करण्यात आली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात यावा, यासाठी न्यायालयात याचिका, ५ मार्च या दिवशी सुनावणी होणार

याचिकेत म्हटले आहे की, पूजा चव्हाण हिचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला असून तिच्या अनेक ऑडिओ क्लीपही प्रसारित झाल्या आहेत. यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची नावे आहेत. असे असतांना या प्रकरणाचे सखोल अन्वेषण झालेले नाही. त्यामुळे आरोपी कधीही मृत्यूच्या प्रकरणातील पुरावे नष्ट करू शकतात.

राज्यातील महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची ५०० कोटी रुपयांची अनामत रक्कम पडून !

विद्यार्थ्यांचे पैसे त्यांना परत केले जावेत, यासाठी पत्रक काढूनही त्यांना अनामत रक्कम वेळेत न मिळणे हा विद्यार्थ्यांवरील अन्यायच आहे. यासाठी उत्तरदायी कोण ? विद्यार्थ्यांना पैसे मिळावेत, यासाठी कार्यपद्धत घालणे आवश्यक आहे.

आईने पंजाबी पोशाख घातल्याने मुलाची आत्महत्या

नागठाणे (जिल्हा सातारा) येथील एका मुलाने त्याच्या आईने पंजाबी पोशाख घातल्याच्या कारणावरून आत्महत्या केली. शेरू शैकत भोसले असे मुलाचे नाव आहे.

महाराष्ट्र आणि केरळ येथून जाणारे प्रवासी कोरोना निगेटिव्ह असणे आवश्यक ! – उपमुख्यमंत्री, कर्नाटक

सांगली जिल्ह्याच्या लगत कर्नाटक सीमेवर कागवाड येथेही कर्नाटक सरकारने पडताळणी नाके उभारले आहेत. कोरोना ‘निगेटिव्ह’ असणार्‍यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.