सातारा, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – खंडाळा गावाच्या सीमेत ३ जणांनी बैलांची हत्या करून मांस टेम्पोत भरले. तसेच विनाअनुमती अवैधरित्या मांसाची वाहतूक केली. या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात या ३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता या घटनेतून दिसून येते ! – संपादक)
याविषयी पोलिसांनी सांगितले की, २३ फेब्रुवारी या दिवशी पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा गावाच्या सीमेत महंमद खान, शफिक बेपारी आणि महंमद रंगरेज या तिघांनी अवैधरित्या बैलांची हत्या केली आणि त्यांचे मांस टेम्पोत भरून वडगाव ते मुंबई विनाअनुमती वाहतूक करणार असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे निखिल खंडागळे यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तिघांविरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण