सातारा, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – खंडाळा गावाच्या सीमेत ३ जणांनी बैलांची हत्या करून मांस टेम्पोत भरले. तसेच विनाअनुमती अवैधरित्या मांसाची वाहतूक केली. या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात या ३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता या घटनेतून दिसून येते ! – संपादक)
याविषयी पोलिसांनी सांगितले की, २३ फेब्रुवारी या दिवशी पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा गावाच्या सीमेत महंमद खान, शफिक बेपारी आणि महंमद रंगरेज या तिघांनी अवैधरित्या बैलांची हत्या केली आणि त्यांचे मांस टेम्पोत भरून वडगाव ते मुंबई विनाअनुमती वाहतूक करणार असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे निखिल खंडागळे यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तिघांविरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !