स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान शाळेच्या भूखंडावरील आरक्षण उठवण्याचा प्रस्ताव महासभेत फेटाळणार ! – युवराज बावडेकर

श्री. बावडेकर पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या शाळेजवळील भूखंडावरील आरक्षण उठवण्यास भाजपचा विरोधच आहे. महासभेसमोर हा विषय आल्यास यावर सखोल चर्चा होऊन तो फेटाळण्यात येईल.

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्रीरामजन्मभूमीला निधी अर्पण

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सातारा विभागाच्या वतीने श्रीरामजन्मभूमी निधी संकलन अभियानास अर्पण निधी म्हणून ११ सहस्र १११ रुपयांचा धनादेश देण्यात आला. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. भिडेगुरुजी यांच्या वंदनीय उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

हेमंत नगराळे यांच्याकडे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार

हेमंत नगराळे हे वर्ष १९८७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी वर्ष १९९८ ते २००२ या कालावधीत केंद्रीय अन्वेषण यंत्रणेमध्येही काम केले. प्रारंभी मुंबई येथे, त्यानंतर देहली येथे उपमहासंचालकपदाचे दायित्व त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

शेळ-मेळावली येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा गोवा सुरक्षा मंचकडून निषेध

शेळ-मेळावली येथील नियोजित आय.आय.टी. प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणार्‍यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा गोवा सुरक्षा मंचकडून ‘गोवा शासनाने या आंदोलकांविरुद्ध केलेली कृती अन्यायकारक आणि लोकशाहीविरोधी आहे’, या शब्दांत निषेध करण्यात आला आहे.

(म्हणे) ‘भारताकडून लडाखमधील पँगाँग तलावाजवळील नैसर्गिक वातावरण नष्ट करण्याचा प्रयत्न !’

भारत नाही, तर चीन येथील वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने येथील भाग सैन्य छावणीमध्ये परावर्तित केला आहे. येथे त्याने बंकर आणि ‘रडार स्टेशन’ उभारले आहेत.

आंदोलकांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शेळ-मेळावली येथे जाणार नाहीत ! – सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शेळ-मेळावली येथे नियोजित आय.आय.टी. प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणार्‍या ग्रामस्थांना भेटण्यासाठी जाणार नाहीत, अशी माहिती भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांना दिली.

‘रामराज्य’ अर्थात् ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी श्रीरामभक्तांकडून ट्विटरवर ट्रेंडद्वारे संकल्प

श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामंमदिर बांधण्याची वाट मोकळी झाली आणि तेथे मंदिराच्या उभारणीसाठी भूमीपूजनही करण्यात आले; मात्र हिंदूंनी श्रीराममंदिर उभारण्यापर्यंत सीमित न रहाता प्रभु श्रीरामाला अपेक्षित असे ‘रामराज्य’ आणण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे आवश्यक आहे.

आज गोवा विधानसभेत विधीमंडळ दिन : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित रहाणार

गोवामुक्तीच्या ६० व्या वर्षानिमित्त गोवा विधानसभा संकुलात ९ जानेवारीला दुपारी ४ वाजल्यापासून विधीमंडळ दिन साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमाला भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे वायूप्रदूषणामुळे प्रतिवर्षी ३ लाख ५० सहस्र गर्भपात !

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांत मोठ्या प्रमाणात होणार्‍या वायुप्रदूषणामुळे प्रतिवर्षी ३ लाख ४९ सहस्र ६८१ गर्भपात होतात, असे लँसेट हेल्थ जर्नलच्या संशोधनामध्ये दिसून आले आहे.

आपत्काळात तरून जाण्यासाठी भक्त होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सध्या आपत्काळास प्रारंभ झाला आहे. या आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताची भक्ती करणे आवश्यक आहे. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून शुद्ध मनाने भक्ती म्हणजेच साधना केली पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.