जेथे-जेथे नमाजाची ठिकाणे पाडली गेली, तेथे-तेथे हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती सापडल्या ! – आमदार श्री. राजू मामा भोळे

पांडववाडा या नावावरूनच आपल्याला हा हिंदूंचा प्राचीन ऐतिहासिक वारसा आहे हे लक्षात येते. जो जुना इतिहास आहे तो कोणालाही पुसता येणार नाही. म्हणूनच पांडववाड्यातील अनधिकृत मदरसा आणि तेथील नमाजपठणावर बंदी घातल्याचा अंतरिम आदेश योग्यच आहे.

उत्तराखंडमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानंतर विजेचा धक्का बसल्याने १५ जणांचा मृत्यू

चमोली येथील अलकनंदा नदीजवळ ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानंतर विजेचा धक्का बसल्याने १५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले.

सीमा हैदर हिला भारतात घुसवण्यामागे षड्यंत्र !

भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिची उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी चालू आहे. तसेच गुप्तचर विभागही अन्वेषण करत आहे. त्यांच्या अन्वेषणातून सीमा हैदर हिला नेपाळमार्गे भारतात पोचण्यासाठी तिसर्‍या व्यक्तीने साहाय्य केल्याची माहिती मिळाली आहे.

न्यायमूर्तींची रेल्वेत गैरसोय : अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून रेल्वे विभागाला नोटीस !

न्यायमूर्तींसारख्या उच्चपदस्थ व्यक्तीची इतकी गैरसोय होत असेल, तर सर्वसामान्य लोकांवर काय परिस्थिती ओढवत असेल ?, याचा विचारच न केलेला बरा !

देशातील १५ राज्यांमध्ये पूरसदृश स्थिती !

देशात मोसमी पावसाचे आगमन होऊन ५० दिवस उलटून गेले आहेत. देशातील उत्तर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. महाराष्ट्रातील कोकण, तसेच गोवा राज्यात चांगला पाऊस पडला आहे.

रतलाम येथे ‘अल् सुफा’ आतंकवादी संघटनेच्या ठिकाणांवर एन्.आय.ए.ची धाड !

या ठिकाणी बाँब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. इम्रान आणि त्याचे साथीदार आतंकवादी कट रचण्यासाठी या ठिकाणाचा वापर करत होते. जयपूर येथे घातपात करण्याचा इम्रान याच्यावर आरोप आहे.

सीमा हैदर हिच्यावर कारवाई न झाल्यास तिला भारताबाहेर पाठवू ! – करणी सेनेची चेतावणी

सीमा हैदर हिच्यावर आतंकवादविरोधी पथक लवकर कारवाई करणार असेल, तर ठीक आहे, अन्यथा करणी सेना तिला देशाबाहेर पाठवेल, अशी चेतावणी करणी सेनेचे उपाध्यक्ष मुकेशसिंह रावल यांनी दिली आहे.

शिवभक्तांवर थुंकणार्‍या तिघांच्या घरावर चालवला बुलडोझर !

उज्जैन येथे भगवान महाकालच्या यात्रेच्या वेळी छतावरून यात्रेकरूंवर थुंकणार्‍या तिघांच्या घरावर प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आला. १७ जुलै या दिवशी येथील खार कुआ भागात ही घटना घडली होती.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस : चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा 

वाशिष्ठीचे पाणी वाढले असल्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे तातडीने स्थलांतर करावे, तसेच पुरामुळे बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.

तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्यासाठी अधिवेशन झाल्यानंतर बैठक बोलवू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

श्री. सुनील घनवट यांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपूर येथे झालेल्या वारकरी महाअधिवेशनामध्ये सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याची, तसेच मंदिर विश्वस्त आणि गड-दुर्ग यांच्या संदर्भात गडप्रेमी संघटनांची बैठक बोलवण्याची मागणी केली.