राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती केली जाणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

काही वृत्तपत्रांमध्ये राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलीसभरती केली जाणार असल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले होते. याविषयी गृहमंत्र्यांनी विधीमंडळात स्पष्टीकरण दिले.

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे वारकर्‍यांच्या आरोग्याला धोका ! – दिलीप मोहिते पाटील, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे शुद्धीकरण न करता सांडपाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडले जाते. दूषित पाण्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

खासगी जागेत वीजमीटर बसतांना वनविभागाच्या ना हरकत दाखल्याची आवश्यकता नाही ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

खासगी जागेवर घर बांधतांना त्या ठिकाणी वीजमीटर घेण्यासाठी वनविभागाच्या नाहरकत दाखल्याची आवश्यकता नाही. भूमी वनविभागाची नसेल, तर अनुमतीची आवश्यकता नाही.

पीक विमा योजनेत १ लाख शेतकर्‍यांच्या सहभागासाठी प्रयत्नशील ! – भाग्यश्री फरांदे, कृषी अधीक्षक

नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग या कारणांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकर्‍याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी केंद्रशासनाने खरीप हंगाम वर्ष २०२३ साठी ‘पंतप्रधान पिक वीमा योजना’ पुढे चालू ठेवण्यास मान्यता दिली आहे.

पुण्यात पकडलेल्या २ आतंकवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील जंगलात बाँबस्फोटाची चाचणी केल्याचे उघड !

कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या २ आतंकवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील जंगलात बाँबस्फोटाची चाचणी केल्याचे आतंकवादविरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

सर्व शासकीय कार्यालये आणि शाळा यांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा लावण्यात यावी !- रवींद्र धंगेकर, आमदार, काँग्रेस

छत्रपती संभाजी महाराज यांचा राष्ट्रपुरुषांच्या सूचीत समावेश करावा, तसेच शाळा आणि सर्व शासकीय कार्यालये यांमध्ये त्यांची प्रतिमा लावण्यात यावी.

..तर विधीमंडळ सभागृहाचे ‘मिडिया हाऊस’ होईल ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

सर्व सदस्यांनी बोलण्यासाठी हात उंचावल्यास कुणाला अनुमती द्यावी, याविषयी अध्यक्षांपुढे प्रश्न निर्माण होतो. बोलायला दिले नाही, तर सदस्य गोंधळ घालतात.

सिंधुदुर्ग : अतीवृष्टीमुळे महावितरणची  ३२ लाख रुपयांची हानी 

ग्राहकांचा वीजपुरवठा लवकर सुरळीत व्हावा, यासाठी वीज कर्मचारी काम करत आहेत, तरी नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे. असे आवाहन महावितरणचे कोकण विभाग जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे.

पुणे येथील खडकवासला धरणातून मुठा नदीत १ सहस्र क्युसेक पाण्याचा विसर्ग !

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांपैकी एक असलेले खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे २५ जुलै या दिवशी सायंकाळी ५ वाजता मुठा नदीत १ सहस्र क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

१ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक दिवसाचा पुणे दौरा निश्चित झाला आहे. १ ऑगस्ट या दिवशी हा दौरा होणार असून या दौर्‍यात ते आधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार असून त्यानंतर ते लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाला येणार आहेत.