यज्ञसंस्कृतीच्या संवर्धनाच्या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दृष्टीकोन !
वैदिक परंपरेत यज्ञ हा केवळ एक विधी नसून तो धर्मसंवर्धन, साधकसंरक्षण आणि समष्टी कल्याणाची प्रभावी साधना आहे. आजच्या काळात यज्ञसंस्कृती लोप पावत असतांना तिचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) अत्यंत सूक्ष्म, शास्त्रनिष्ठ आणि व्यापक असा दृष्टीकोन दिला आहे.