संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे पालखी मार्ग होणार भक्तीमार्ग ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे काम पुढील दीड वर्षांत पूर्ण केले जाईल. यासाठी १२ सहस्र कोटी रुपयांची तरतूद !

समर्थ रामदासस्वामी यांच्या चित्ररथाचा समावेश देहली येथील संचलनात न केल्याने निषेध

देहली येथे झालेल्या संचलनातील चित्ररथात महाराष्ट्रातील संतांसमवेत संत रामदासस्वामी यांना स्थान न दिल्याने आम्हा भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

माघ वारी होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वारकर्‍यांनी घेतली भेट

कोरोनाचा प्रादुर्भाव न्यून झाल्याने अनेक सार्वजनिक उपक्रम चालू झाले आहेत. मंदिरेही दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत, तसेच लसीकरणाची मोहीमही चालू करण्यात आली आहे. नियम आणि अटी पाळून वारकर्‍यांना वारीसाठी संमती मिळावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली.

ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांचे धर्मकार्य

वारकरी संप्रदायातील पितामह, परखड वक्ते, धर्मनिष्ठ, ब्रह्मनिष्ठ वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु धर्मभूषण, धर्मभास्कर, साधकांचे मायबाप, महाराष्ट्र्रातील सर्व वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेले श्री गुरु ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते  यांनी मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी म्हणजे २१ डिसेंबर या दिवशी देह ठेवला. त्यांच्या चरणी शतशः नमन !

सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांचे संतपद घोषित !

ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांच्या सनातनच्या देवद येथील आश्रमातील सन २०१६ च्या भेटी वेळीच त्यांचे संतपद घोषित करण्यात आले. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, प्रसाद आणि श्रीकृष्णाचे चित्र देऊन सन्मान केला होता.

हिंदुत्वाचा आधारवड हरपला !

धर्मतेजाने हिंदु समाजाला असलेले धर्माविषयीचे अज्ञान दूर करणार्‍या या महान संत विभूतीच्या जाण्याने हिंदु समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे; देहाने जरी अस्तित्वात नसले, तरी निर्गुणातून त्यांचे कार्य चालूच रहाणार. धर्मरक्षणार्थ झटण्यासाठी त्यांनी धर्मप्रेमींना बळ आणि आशीर्वाद द्यावेत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !

अकोला येथील वारकरी संघटनांचे आमरण उपोषण मागे !

१०० भाविकांच्या उपस्थितीत भजन आणि कीर्तन यांकरिता अनुमती देण्यात यावी,या मागणीसाठीचे वारकरी संघटनांचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले.

अकोला येथे भजन आणि कीर्तन यांसाठी वारकरी संघटनांचे आमरण उपोषण !

वारकर्‍यांकडून उपोषणस्थळी सरकारला सद्बुद्धी मिळावी, यासाठी संत गजानन महाराज यांच्या मूर्तीसमोर ‘सद्बुद्धी यज्ञ’ करण्यात आला. 

इंदुरीकर महाराजांच्या खटल्याची पुढील सुनावणी २ डिसेंबर या दिवशी !

अपत्य जन्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणी कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या विरोधातील खटल्याची पुढील सुनावणी २ डिसेंबर या दिवशी होणार आहे.

आळंदीकरांच्या आरोग्याचा विचार करून कार्तिकी यात्रेचे आयोजन करावे ! – आळंदी ग्रामस्थांची मागणी

यंदा आळंदीची कार्तिकी यात्रा ८ ते १४ डिसेंबर या कालावधीत आहे. तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये प्रतिवर्षी कार्तिकी एकादशीला ७ ते ८ लाख भाविक आळंदीत येत असतात.