भारताला अखंड हिंदु राष्ट्र बनवण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही ! – टी. राजासिंह, आमदार, भाजप, तेलंगाणा
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात जागवले हिंदूतेज !
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात जागवले हिंदूतेज !
आपण जन्माने ‘हिंदू’ आहोत, कर्मानेही ‘हिंदू’ होणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी कर्म केले, तरच आपणाला भगवान श्रीकृष्णाचे साहाय्य मिळेल.
भारतात जातीवाद, प्रांतवाद आदी निर्माण झाला आहे. हे रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र करणे अतिशय आवश्यक आहे.
सर्व सुविचारांची देवाण-घेवाण होणार आहे आणि ‘हिंदु राष्ट्र निर्मिती’च्या विचाराला पुष्कळ मोठे बळ प्राप्त होणार आहे. या अधिवेशनासाठी आमच्या श्रीक्षेत्र दत्त देवस्थान, देवगडच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करतो.
भारत हिंदु राष्ट्र व्हावे, हेच या अधिवेशनाचे स्वप्न आहे. हा देश केवळ हिंदु राष्ट्रच नाही, तर विश्वगुरु बनू शकतो; कारण आपल्या देशात भारतमातेने अशा सुपुत्रांना जन्माला घातले आहे की, ज्यांच्या सामर्थ्याची आपण कोणतीही तुलना करू शकत नाही.
धर्मकार्यामध्ये योगदान देणारे युवक निर्माण व्हावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्रवीर’ निर्माण करण्याचे कार्य चालू आहे.
शिवरायांनी मावळ्यांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणे रणनीती निश्चित करून हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करायला हवे.
जेव्हा धर्मावर अधर्म वरचढ झाला, तेव्हा भगवान परशुरामाने परशू धारण केला. अशा परशुरामाला आपण आदर्श मानले पाहिजे. ही तपस्या करण्याची नव्हे, तर युद्ध करण्याची वेळ आहे.
या वेळी सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन, ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात लढा देणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, देवस्थानचे सचिव प्रशांत केरकर, ॲटर्नी पंढरीनाथ बोडके आणि सनातन संस्थेचे श्री. नारायण नाडकर्णी उपस्थित होते.
‘जिहादी हे जगातील सर्वांत गरीब आणि श्रीमंत देशांतील नागरिकांचीही हत्या करत आहेत. जगात असा कोणता देश आहे, जिथे जिहादी कारवाया होत नाहीत ?’ – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन