नेपाळी नाट्य !
नेपाळमधील सरकार अस्थिर झाल्यामुळे चीनचे धाबे दणाणले आहेत. ओली चीनच्या मर्जीतले. पुढे निवडणूक होऊन ते पराभूत झाल्यास नेपाळवर चीनचे असलेले नियंत्रण सुटेल, अशी चीनला भीती वाटत आहे. चीनला ते नको आहे.
नेपाळमधील सरकार अस्थिर झाल्यामुळे चीनचे धाबे दणाणले आहेत. ओली चीनच्या मर्जीतले. पुढे निवडणूक होऊन ते पराभूत झाल्यास नेपाळवर चीनचे असलेले नियंत्रण सुटेल, अशी चीनला भीती वाटत आहे. चीनला ते नको आहे.
ब्रेग्झिट ही युरोपीय देशांसाठी चिंतेची गोष्ट असली, तरी भारताला पारतंत्र्यातील अन्यायाच्या जखमा भरण्यासाठी नियतीने दिलेली मोठी संधी आहे. युरोपीय देशांवर आलेला हा नियतीचा फेरा आहे. त्यांनी जी कर्मे केली, त्यांची फळे ते आज या समस्यांच्या रूपातून भोगत आहेत !
जे प्राथमिक आहे, तेच होत नाही, तर आंतरिक प्रेरणेने जनतेला काय आवश्यक आहे, ते जाणून घेऊन करणे किती दूर आहे ! ते होण्यासाठी प्रखर राष्ट्रनिष्ठा, जनतेप्रती प्रेम आणि पालकत्वाची भावना हवी ! तसे झाल्यास न्यायालयाला अशा गोष्टींत लक्ष घालावे लागणार नाही !
पाक हा आतंकवाद जोपासणारा, आतंकवादी हाफीज इत्यादींची मानमरातब करणारा, त्यांना संरक्षण देणारा आणि आतंकवादाचे उगमस्थान असणारा, जगभरात आतंकवाद निर्माण करणारा ओसामा बिन लादेन, दाऊद इब्राहीम यांना पाक वास्तव्याला सुरक्षित ठिकाण वाटत असेल, तर तेथील प्रत्येकाला आतंकवादी म्हटल्यास वावगे काय ?
एवीतेवी लोकशाहीचा टेंभा मिरवणारी काँग्रेस स्वतःचा स्वार्थ साधतांना नेहमीच लोकशाहीचा गळा घोटते, हाही इतिहास आहे. कृषी कायद्याचेच पहायचे झाले, तर हा कायदा लोकशाही मार्गाने सार्वभौम संसदेने संमत केला. तरीही काँग्रेस यास विरोध करून एक प्रकारे लोकशाहीचा अवमानच करत नाही का ?
देशात चर्च संस्थेला हिंदूंची मंदिरे आणि मुसलमानांच्या मशिदी यांच्या तुलनेत अधिक सुसंस्कृत, सभ्य आणि प्रेमाचे अन् शांततेचे पाईक समजले जात होते. हे किती तकलादू आणि ढोंगी आहे, हे सिस्टर अभया या घटनेतून उघड झाले . चर्च संस्थेचे खरे स्वरूप भारतियांच्या आता लक्षात येऊन ते त्यांच्याविषयी ताकही फुंकून पितील, अशी अपेक्षा.
आतापर्यंत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (यूएई), रशिया आणि मालदीव यांनी त्यांच्या देशाच्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी मोदी यांना सन्मानित केले. त्यात आता अमेरिकेची भर पडली आहे. हा काळाचा महिमा आहे. येणार्या काळात भारत विश्वात सर्वोच्च स्थानावर जाणार आहे, याची ही नांदी आहे.
धर्मतेजाने हिंदु समाजाला असलेले धर्माविषयीचे अज्ञान दूर करणार्या या महान संत विभूतीच्या जाण्याने हिंदु समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे; देहाने जरी अस्तित्वात नसले, तरी निर्गुणातून त्यांचे कार्य चालूच रहाणार. धर्मरक्षणार्थ झटण्यासाठी त्यांनी धर्मप्रेमींना बळ आणि आशीर्वाद द्यावेत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !
अमेरिकेत विवाहबाह्य संबंधांना ऊत आल्यावर तेथील सरकारने ‘बॅक टू फॅमिली’, ‘बॅक टू मदरहूड’ यांसारख्या चळवळी चालू केल्या. लोकांना लग्न टिकवण्यासाठी आवाहन केले. असे आवाहन भारतियांना करावे लागू नये, यासाठी विकृत मालिका, चित्रपट यांवर निर्बंध घालण्यासमवेत लोकांना नैतिकता वाढवण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
भाजपने तेथे मतपेटीच्या पलीकडे जाऊन बंगालच्या हिंदूंना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे कार्य करावे, इतकीच अपेक्षा !