
मुंबई – राज्यातील जवळपास ६४ लाख शेतकर्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून त्यांच्या खात्यावर थेट २ सहस्र ५५५ कोटी विमा हानीभरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा आस्थापनांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून २ सहस्र ८५२ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित हानीभरपाईची रक्कम शेतकर्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना विमा आस्थापनांना देण्यात आल्या असून, शेतकर्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
या अंतर्गत खरीप वर्ष २०२२ आणि रब्बी वर्ष २०२२-२३ या हंगामांसाठी २ कोटी ८७ लाख, खरीप २०२३ साठी १८१ कोटी, रब्बी २०२३-२४ साठी ६३ कोटी १४ लाख आणि खरीप वर्ष २०२४ साठी २ सहस्र ३०८ कोटी रुपये इतकी हानीभरपाई शेतकर्यांना देण्यात येणार आहे.