गोवा-कारवार यांना जोडणारा ‘काळी’ नदीवरील ४१ वर्षे जुना पूल कोसळला

गोवा राज्य आणि कारवार यांना जोडणारा मडगाव-मंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील ‘काळी’ नदीवर असलेल्या ४१ वर्षे जुन्या पुलाचा काही भाग मंगळवार, ६ ऑगस्ट या दिवशी रात्री कोसळला.

मोकाट गुरांची समस्या सोडवण्यासाठी नजीकच्या काळात नवीन कायदा करणार ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मोकाट गुरांची समस्या सोडवण्यासाठी पुढच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये नवीन कायदा करणार, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ७ ऑगस्टला विधानसभेत दिले.

गोवा सरकारचा शिलकी महसूल ५९ कोटी रुपयांवरून २ सहस्र ४०० कोटी

वर्ष २०१८ ते वर्ष २०२३ या ५ वर्षांपैकी ३ वर्षांच्या शिलकी महसुलाची नोंद झाली असून वर्ष २०२२-२३ मध्ये सर्वांत अधिक म्हणजे २ सहस्र ४०० कोटी रुपयांच्या शिलकी महसुलाची नोंद झाली असल्याचे महालेखापालांच्या अहवालात म्हटले आहे.

अनेक वेळा तक्रारी करूनही अनधिकृत मदरशावर प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे ग्रामस्थांचे पुन्हा १५ ऑगस्टला उपोषण

गेली २ वर्षे शहरालगतच्या धोपेश्वर ग्रामपंचायतीच्या हद्दीत पन्हळे तर्फे राजापूर या गावामध्ये चालू असलेला अनधिकृत मदरसा बंद करावा, असा ठराव ग्रामसभेमध्ये पारित झाला आहे.

कल्याण येथे रेल्वेस्थानकामध्ये महिला प्रवाशावर महिला तिकीट कर्मचार्‍याकडून आक्रमण !

प्रशासकीय कर्मचार्‍यांनी सामान्य जनतेशी कसे वागावे ? याचे मूल्यशिक्षण देण्याची वेळ येणे हे प्रशासनाला लज्जास्पद ! संयम आणि रागावर नियंत्रण नसल्याने क्षुल्लक कारणावरून शासकीय कर्मचार्‍यांनी प्रवाशांना अशी वागणूक देणे अशोभनीय आहे !

बांगलादेशातील अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी समन्वय समितीची स्थापना !

बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना भारतात सुरक्षितपणे आणण्यासाठी केंद्रशासनाकडून प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने समन्वय समितीची स्थापना केली आहे.

पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्या विरोधात सांगली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !

माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या सौ. नीता केळकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

मिरज येथील श्री संत वेणास्वामी मठाच्या ३६९ व्या वर्धापन उत्सवास प्रारंभ !

काकड आरती, महापूजा, कीर्तन, उपासना तथा पिठस्थ देवतांच्या दर्शनाचा लाभ सर्व भक्तांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी केले आहे.

मिरज येथे श्री दासबोध अभ्यास मंडळाच्या वतीने ‘सामूहिक श्री हनुमान उपासने’चे आयोजन !

महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांसह अन्य अनेक राज्यांत आणि परदेशांतही ‘श्री हनुमान सामूहिक उपासना’ आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष श्री. श्याम साखरे यांनी श्री दासबोध अभ्यास मंडळाच्या वतीने दिली.

पुणे महापालिकेच्या वसतिगृह प्रशासनाच्या विरोधात अभाविपचे आंदोलन !

असे आंदोलन का करावे लागते ? महापालिका प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ?